किल्लेधारूर दि.२५(वार्ताहर) तालुक्यातील आवरगावात आलेल्या ऊसतोड मजूरांना ग्रामपंचायतच्या वतीने राष्ट्रवादीचे युवानेते आमोल जगताप यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला.
धारुर तालुक्यातील बहुतेक लोक ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यात जातात. यंदा कोरोनामुळे अनेक कारखान्यातील ऊसतोड मजूर गावाकडे परतलाच नव्हता. शासनाच्या निर्णयानंतर ऊसतोड मजूर परतत आहेत. तालुक्यातील आवरगाव येथील वीस ते पंचेवीस उसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्रातून परतली आहेत. या सर्व मजुरांची तपासणी करुन त्यांना घरात राहण्याच्या सुचना करण्यात आल्य आहेत. आवरगावातील ऊसतोड मजूर कसत असलेल्या गायरानात निवासी आहेत. या ऊसतोड मजूरांना राष्ट्रवादीचे युवानेते आमोल जगताप यांनी घरपोच धान्य, किराणा व जीवनावश्यक वस्तू पुरवल्या असुन आरोग्याची काळजी घेत घरातच राहण्याचा सल्ला दिला.