BEED24

जिल्ह्यात कसलीही सुट नाही, अफवाना बळी पडू नका

किल्लेधारूर दि.२०(वार्ताहर) २० एप्रिल पासुन अनेक व्यवसाय उद्योगात सुट मिळाल्याच्या अफवे बरोबरच बससेवाही सुरु होत असल्याच्या अफवा येत असुन आज प्रशासनाच्या वतीने अद्याप बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कसलेही नवीन आदेश काढलेले नसुन सध्या तरी जैसे थे परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे. जनतेने कसल्याही अफवांना बळी पडू नये. नवीन आदेश प्राप्त होईपर्यंत कसलाही बदल होणार नाही.

देशभरात दुसऱ्या टप्प्याचे लॉकडाऊन घोषित करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० एप्रिल नंतर काही भागात शिथिलता देण्याचे संकेत दिले होते. यानंतर सामान्य जनतेत मात्र जिल्हा अंतर्गत बससेवा, उद्योग व व्यापार सुरु होणार असल्याच्या अफवा वाढल्या होत्या. केंद्र व राज्य सरकारने काही बाबतीत घोषणा केली असली तरी त्याचा थेट परिणाम ग्रामिण भागात दिसुन येणार नाहीत. मात्र शहरात काही ठिकाणी काही ठराविक व्यवसायिकांनी आपले दुकाने खुली केल्याचे दिसुन येत आहेत. तर जिल्हाअंतर्गत अडकून राहिलेल्या प्रवाशांनीही बस अथवा खाजगी वाहने सुरु झालीत का पाहण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसुन आले. बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अद्याप जिल्ह्याबाबतील कसलेही नवीन आदेश काढलेली नाहीत. जनतेने कुठल्याही अफवांना बळी पडू असे आवाहन करत नवीन आदेश प्राप्त होईपर्यंत जैसे थे परिस्थिती राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Exit mobile version