दिंद्रुड दि.१८(प्रतिनिधी) धारुर तालूक्यातील कासारी बोडखा येथील शेतीच्या वादातून दिंद्रूड पोलीस ठाण्यात तक्रार का दिली म्हणून महिलेचा विनयभंग करत घरच्या मंडळीना मारहाण केल्या प्रकरणी चार जना विरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.
धारुर तालूक्यातील कासारी बोडखा येथील एक महिला पती, सासू व मुलासह शेतात काम करून परतत असताना ग्रामपंचायत कार्यालया समोर शेतातील भांडण प्रकरणी पोलीसा कडे तक्रार का केलीस म्हणून चार जनांनी शिवीगाळ करून पतीस मारहाण केली. यावेळी सासू व फिर्यादी पत्नी सोडवण्यास गेले असता महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारी वरून दिंद्रूड पोलीस ठाण्यात आरोपी अंगद बाबासाहेब बडे, अकूंश बाबासाहेब बडे, व्यंकट बन्सी बडे, उत्तमराव देवराव बडे यांच्या विरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे हे करत आहेत.