BEED24

शहरात शिथिलता; सहा दिवस बंद राहणारे एकमेव शहर

किल्लेधारूर दि.४(वार्ताहर) शहरात रात्री आलेल्या निगेटिव्ह अहवालानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संचारबंदीतून शिथिलता दिली असुन केवळ दुधिया गल्लीत प्रतिबंधात्मक व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सतत सहा दिवस बंद राहणारे जिल्ह्यात केवळ धारुर शहर एकमेव ठरले आहे.

सहा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शहरात आज सकाळी सात ते सांयकाळी साडे सहा पर्यंत सर्व व्यवसाय उघडणार आहेत. रात्री आलेल्या निगेटिव्ह अहवालानंतर शहरात अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या शिफारशी नंतर शहरातील दुधिया गल्ली कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहिर करत तेथे प्रतिबंधात्मक व्यवस्था कायम ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात रुग्ण सापडल्यानंतर सहा दिवस संचारबंदीला तोंड देणारे केवळ धारुर शहर ठरले आहे. दरम्यान सर्व व्यवसाय सुरु होत असल्याने शहरात समाधान व्यक्त होत आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या इतर आदेशाचे पालन करणे बंधनकारक  राहणार आहे.

Exit mobile version