BEED24

ॲड. सुभाष राऊत यांना विधान परिषदेवर घ्या – राजेभाऊ कटारे

दिंद्रुड दि.२०(प्रतिनिधी )राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागा रिकाम्या होत आहेत या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाचे नेते तथा महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष अॅड, सुभाष राऊत यांना विधान परिषदेवर घेवून बहुजन समाजाला न्याय द्यावा अशी मागणी महात्मा फुले समता परिषद माजलगाव तालुका उपाध्यक्ष राजेभाऊ कटारे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

अॅड सुभाष राऊत हे ओबीसी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र लढणारे नेते आहेत त्यांनी अनेकदा बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील धरणे आंदोलन,रस्ता रोको, जेलभरो आंदोलन केली आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारच्या सरकारने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे औरंगाबाद विभाग अध्यक्ष अॅड सुभाष राऊत यांना विधान परिषदेवर घेऊन बीड जिल्ह्यातील बहुजन समाजाला न्याय द्यावा अशी मागणी तालुका उपाध्यक्ष राजेभाऊ कटारे यांनी केली आहे.

Exit mobile version