औरंगाबाद दि.17 मे – Aurangabad Osmanabad संभाजीनगर ऐवजी औरंगाबाद हेच नाव वापरण्याचे आदेश औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांना काढले असून गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा नामांतर विषय चर्चेत आला आहे. नामांतराबाबत उच्च न्यायालयाने दि.24 एप्रिल रोजी प्रशासकीय पातळीवर शहराचे नाव अंतिम निर्णय होईपर्यंत औरंगाबादच ठेवण्याचे आदेश दिले असल्याने हे आदेश काढण्यात आले आहेत. Aurangabad Osmanabad Order. to use the name Aurangabad instead of Sambhajinagar.
महाराष्ट्रातील औरंगाबाद व उस्मानाबाद ( Aurangabad Osmanabad) शहर व जिल्ह्याचे नामांतराचा विषय चांगलाच गाजत आहे. ठाकरे सरकार पाठोपाठ शिंदे सरकारने औरंगाबाद व उस्मानाबाद शहर व जिल्ह्याच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. या निर्णयास आवाहन देणाऱ्या अनेक याचिका मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दाखल झाल्या आहेत. दरम्यान, महसुल विभागाने नामांतरासाठी हरकती व सुचना मागितल्या होत्या. यात लाखो अर्ज दाखल झाल्या असून अद्याप यावर निर्णय झालेला नाही. तसेच सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना शहराची नावे बदलण्याचा जाणूनबुजून प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे एक जनहित याचिका 3881/2023 दाखल झाल्यानंतर उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) याबाबत दि.24 मार्च पर्यंत केंद्र शासनाला उत्तर दाखल करण्यास सांगितले होते.
नामांतर बाबत अंतिम निर्णय झालेला नसून दि.24 एप्रिल रोजी न्यायालयाने (Mumbai High Court) अंतिम निर्णय होईपर्यंत औरंगाबाद व उस्मानाबाद असाच उल्लेख करण्याचे निर्देश दिलेले असताना कार्यालयीन दस्तऐवजावर नाव बदलने सुरुच आहे. याबाबत स्थानिक नामांतर विरोधी कृती समितीने न्यायालयाच्या आदेशाच्या प्रती प्रशासकीय यंत्रणाकडे देत न्यायालयाचा आदेश पाळण्याची मागणी केली. दि.8 मे रोजी औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी औरंगाबाद असाच उल्लेख करण्याचे लेखी आदेश काढून आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे नमुद केले आहे. सोबत न्यायालयाच्या आदेशाची प्रत पाठवण्यात आली आहे. दोन दिवसांपासून या विषयाची चर्चा सुरु झाली असून माध्यमातून याची दखल घेतली जात आहे.