किल्लेधारूर दि.१४(वार्ताहर) धारूर तालूक्यातील आवरगाव ग्रामपंचायतने आर. आर. पाटील ग्रामस्वच्छता स्पर्धेत बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे बक्षिस प्राप्त केले असून हे बक्षिस मिळवल्यावर ग्रामस्थांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. राज्यात गाव आदर्श करण्याचा संकल्प सरपंच अमोल जगताप यांनी व्यक्त करत बक्षिसा बद्दल समाधान व्यक्त केला.
राज्य शासनाच्या वतीने राज्यात जिल्हास्तरावर ग्रामपंचायतीसाठी आर. आर. पाटील ग्रामस्वच्छता स्पर्धा राबविण्यात आली. या स्पर्धेत धारुर तालुक्यातील आवरगाव ग्रामपंचायतने उत्कृष्ट काम करून तालूकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून २० लक्ष रुपयाचे बक्षिस मिळवले होते. जिल्हास्तरीय तपासणीत आवरगाव ग्रामपंचायतने प्रथम मिळवला असून. ग्रामस्थानी एकत्रित येवून युवक सरपंच अमोल जगताप यांचे नेतृत्वा खाली गावाचा चेहरा मोहरा बदलला असून ग्रामस्थांना सर्व सुविधा दिल्या आहेत. आर. आर. पाटील ग्रामस्वच्छता स्पर्धेत बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून ५० लक्ष रुपयाचे बक्षिस मिळाले आहे. आवरगाव ग्रामपंचायतला या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे ग्रामस्थानी फटाके वाजवून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. पंचायत समितीचे सभापती हनूमंत नागरगोजे, उपसभापती प्रकाश कोकाटे, गटविकास अधिकारी आर. एस. कांबळे, विस्तार अधिकारी अनिल चौरे यांनी या यशाबद्दल ग्रामपंचायतचे कौतूक केले आहे.
राज्यात आदर्श गाव करण्याचा संकल्प
-अमोल जगताप
आर. आर. पाटील ग्रामस्वच्छता स्पर्धेत आवरगाव ग्रामपंचायतने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. ग्रामस्थांचे मदतीने व सहकार्या मुळे हे यश मिळाले असून विकास कामातून गावाचा चेहरा मोहरा बदलून राज्यात आदर्श व वेगळे गाव करण्याचा संकल्प असल्याचे मनोदय सरपंच अमोल जगताप यांनी व्यक्त केला.