BEED24

biggest train accident भारतातील सर्वात मोठा रेल्वे अपघात ; अपघातात 233 जणांचा मृत्यू .

बालासोर दि.3 जून – biggest train accident ओडीसामधील बालासोरनजीक शुक्रवारी सांयकाळी तीन रेल्वेचा भीषण अपघात झाला. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथून पश्चिम बंगालमधील कोलकात्यानजिकच्या हावडा रेल्वे स्थानकापर्यंत धावणारी कोरोमंडल एक्सप्रेस Coromandel Express (12841) एका मालगाडीला धडकून यशावंतपूर हावडा एक्सप्रेसवर कोसळून झालेल्या अपघातात 233 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 900 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. भारतातील आजवरचा हा सर्वात मोठा अपघात ठरला आहे. (biggest train accident … India’s biggest train accident; 233 people died in the accident.)

A terrible accident took place in three trains on Friday evening near Balasoran in Odisha. Coromandel Express (12841) running from Tamil Nadu’s capital Chennai to Howrah railway station near Kolkata in West Bengal collided with a freight train and crashed into Yeshavantpur Howrah Express, killing 233 passengers and injuring more than 900 others. This is the biggest accident ever in India.

मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात शनिवार दि.3 जूनच्या सकाळपर्यंत 233 जणांचा मृत्यू तर 900 हून अधिक जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. जखमींवर जवळच्या गोपालपूर आणि बालासोर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातातील मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीतीसुद्धा व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहोचले असून ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक घटनास्थळी रवाना झाले आहेत. एनडीआरएफ व राज्य सरकारची
बचावकार्यासाठी पथकं घटनास्थळी रेस्क्यू करत आहेत.

ओडिशातील अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त करत अपघातात सापडलेल्या सर्वांना सर्वतोपरी साहाय्य केलं जाईल असं म्हटलं आहे. राहुल गांधीसह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. दरम्यान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 2 लाख व किरकोळ जखमी झालेल्या लोकांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे. बचावकार्यासाठी वेगवेगळी पथकं निर्माण करण्यात आली असून मदतीसाठी हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे. सदरचा अपघात ऐवढा भीषण होता की यात आजपर्यंतची सर्वात जास्त जीवितहानी झाली आहे. या अपघातामुळे रेल्वेसेवा कोलमडली असून अन्य ट्रेन्सची वाहतूक नियंत्रित किंवा स्थगित करावी लागणार आहे.

मडगाव मुंबई (Madgaon-Mumbai) वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन रद्द
मडगाव मुंबई (Madgaon-Mumbai) वंदे भारत एक्सप्रेसचे आज दिनांक 3 जून रोजी होणारे उद्घाटन (Inauguration) ओरिसा मधील भीषण रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले आहे. गोव्यात मडगाव स्टेशनवर मुंबईसाठी वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवला जाणार होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचे (Vande Bharat Express) उद्घाटन होणार होते.

 

Exit mobile version