मुंबई दि.19 एप्रिल – महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना बाधित (Corona Positive) संख्येत मोठी वाढ होताना दिसत होती. 60 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद गेली कही दिवसात दररोज होत होती. पण आज काहीसे चित्र दिलासादायक आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 58 हजार 924 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळले असून 351 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
(Comfort the state today; A large decrease in the number of corona infections.)
महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना बाधितांची संख्या 38 लाख 98 हजार 262 वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 60 हजार 824 जणांचा मृत्यू झाला आहे. तसचे आज दिवसभरात 52 हजार 412 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण 31 लाख 59 हजार 240 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.04 टक्के एवढे झाले आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर 1.56 टक्के एवढा आहे.
आज नोंद झालेल्या एकूण 351 मृत्यूंपैकी 220 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 85 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 46 मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे 46 मृत्यू, अहमदनगर- 8, ठाणे- 8, नाशिक- 7, परभणी- 4, नागपूर- 3, पालघर- 3, जळगाव- 2, नांदेड- 2, पुणे- 2, रायगड- 2, सोलापूर- 2, वाशिम- 2 आणि औरंगाबाद- 1 असे आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 40 लाख 75 हजार 811 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 38 लाख 98 हजार 262 (16.19 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 37 लाख 43 हजार 968 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 27 हजार 81 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 6 लाख 76 हजार 520 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) आता 81.04 टक्के एवढे झाले आहे.