BEED24

राज्यातील ‘या’ आदर्श गावात होणार पस्तीस वर्षानंतर निवडणूका…

अहमदनगरः दि.५- राज्यात नावाजलेल्या अहमदनगर (Ahemadnagar) जिल्ह्यातील हिवरे बाजार (Hiware Bazar) व राळेगणसिध्दी (Ralegan siddhi) या गावात तब्बल तीस व पस्तीस वर्षानंतर निवडणूका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोना काळानंतर विस्कटलेला गावगाडा सुरळीत करण्यासाठी राज्यात होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध करण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी आवाहन केल्याच्या बातम्या आपण पाहिल्या. मात्र महाराष्ट्रात ज्या गावांचा आदर्श घेतला जातोय त्याच गावांत यंदा ३० ते ३५ वर्षांचा बिनविरोधचा पायंडा मोडित निघाल्याचे दिसुन येत आहे. अहमदनगर (Ahemadnagar) जिल्ह्यातील अण्णा हजारे (Anna Hajare) यांचे राळेगणसिध्दी (Ralegan siddhi) गाव ३५ वर्षानंतर तर पद्मश्री पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांचे हिवरे बाजार (Hiware Bazar) गाव ३० वर्षानंतर निवडणूकीला सामोरे जात आहे. विशेष म्हणजे स्वतः पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांच्या समोर एका शिक्षकाने आवाहन उभे केले आहे.

Exit mobile version