BEED24

लोकानां रोजगार निर्मिती, ऊस उत्पादकांना न्याय व बेरोजगारांच्या मदतीसाठी कारखाना सुरु-रमेश आडसकर

 

#Ramesh Adaskar

अंबाजोगाई दि.२९ (प्रतिनिधी) ऊस उत्पादक शेतकरी सभासद, कामगार यांच्या हितासाठी व अंबासाखर ही सहकारी संस्था टिकली पाहिजे या विधायक भूमिकेतून अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना नव्या जोमाने सुरु झाला आज ३५ व्या गळीत हंगामास प्रारंभ झाला आहे. अंबासाखर बीड जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊसाला भाव देईल असे सांगुन शेतकर्‍यांनी आपला ऊस अंबासाखरला द्यावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन रमेश बाबुरावजी आडसकर #Ramesh Adaskar यांनी प्रास्ताविक पर भाषणात केले.

अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या सन 2020-2021 च्या 35 व्या गळीत हंगामाचा आज दि.२९ रोजी शुभारंभ झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई पिपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.चे माजी सभापती राजेसाहेब देशमुख, केज कृ.ऊ.बाचे माजी सभापती अंकुशराव इंगळे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन हाणमंतराव मोरे, केज कृ.उ.बा.चे सभापती संभाजीराव इंगळे, अंबाजोगाई कृ.उ.बा.चे उपसभापती गोविंदराव देशमुख, भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी, जिल्हा बँकेचे संचालक ऋषिकेश आडसकर, धारुर कृ.उ.बा. समिती उपसभापती सुनिल शिनगारे आदी उपस्थित होते. वर्ष 2020-21 च्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरूवार दि.29 ऑक्टोबर रोजी कारखान्याचे जेष्ठ संचालक प्रा.वसंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते गव्हाणीचे विधीवत पुजन करुन मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला. चेअरमन रमेश आडसकर #Ramesh Adaskar यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की केज, अंबाजोगाई, माजलगाव, धारूर, वडवणी या तालुक्यातून गळीत हंगामास उपस्थित सर्व ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे कामगार व हितचिंतक यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छांच्या बळावर आणि आशिर्वादाने कारखाना सुरु करण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतला. त्यामुळे काटकसर करुन हा कारखाना चालविला जाईल. ऊस वाढीसाठी शेतकर्‍यांनी प्रयत्न करावेत कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर हा कार्यक्रम होत आहे. गतवर्षी पाऊस व ऊस नसल्याने या भागातील कारखाने बंद होते. अंबासाखर मराठवाड्यातील सर्वात जुना कारखाना आहे. कारखान्याची मशिनरी जुनी आहे. जिद्दीने हा कारखाना सुरु करण्याचा प्रयत्न आहे. मागील तीन महिन्यापासून सर्व कर्मचारी ताकदीने व जोशपूर्ण काम करीत आहेत. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने कारखाना सुरु केला ही संस्था टिकवून ठेवायची आहे. कारण, 1200 लोकानां रोजगार निर्मिती होते. ऊस उत्पादकांना न्याय मिळतो. बेरोजगारांना मदत होते असे प्रास्ताविक पर भाषणात बोलताना मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पांडुरंग अंजान यांनी तर आभार प्रेमचंद पवार यांनी मानले.

Exit mobile version