BEED24

महाराष्ट्रातील सर्व निर्बंध उठणार; ‘ओपनिंग अप’ कडे वाटचाल.

मुंबई दि.14 जुलै – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात अनेक वेळा वेगवेगळी निर्बंध लावण्यात आली. राज्यातील निर्बंधांबाबत सतत सुरू असलेल्या धरसोडीमुळे व्यापारी वर्गात मोठा असंतोष आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून महाराष्ट्र टप्प्याटप्प्याने ‘अनलॉक’ (Maharashtra unlock) करण्याची तयारी राज्य सरकारकडून सुरू आहे. राज्याला ‘ओपनिंग अप’कडे (Opening Up) नेण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. मात्र, मुंबईत लोकल प्रवास तूर्त सर्वांसाठी खुला होणार नसल्याची शक्यता आहे. तसा अहवाल राज्याच्या टास्क फोर्सने (Task force) राज्य सरकारकडे सादर केला आहे.

(Maharashtra to be ‘unlocked’ in phases; Towards ‘opening up’.)

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर गेल्या तीन महिन्यापूर्वी राज्यात दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली. यानंतर राज्य सरकारने राज्यभर ब्रेक दि चैन (Break the chain) अंतर्गत निर्बंध लावण्यात आली. यानंतर अनेकवेळा या निर्बंधात (restrictions) बदल करण्यात आली. यामुळे राज्यातील व्यापारी सततच्या लॉकडाऊनवर (lockdown) नाराजची सूर उमटू लागला. शिवाय त्यासोबत मंत्री आणि सहकारी पक्षांनीही नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांनी महाराष्ट्र अनलॉक (Maharashtra unlock) कशाप्रकारे करता येईल, याचा अभ्यास करून अहवाल देण्याचे आदेश टास्क फोर्सला दिले होते.

या टास्क फोर्सने आपला अहवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhav Thakre) यांना दिला आहे. उद्योग, व्यापारावर असलेले निर्बंध (restrictions) हटवून कशा सवलती देता येतील यासंदर्भातील सूचना टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत. या अहवालावर याच आठवड्यात टास्क फोर्सच्या सदस्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री टप्प्याटप्प्याने निर्बंध हटविण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्याची शिफारस
-‘अनलॉक’च्या पहिल्या टप्प्यात राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंटस् रात्री दहापर्यंत सुरू ठेवावेत, असे टास्क फोर्सने सुचवले आहे.
-सरकारी तसेच खासगी कार्यालयांतील उपस्थितीची मर्यादा 50 टक्क्यांवरून 75 टक्के करण्याची शिफारस केली आहे.
-हॉटेल आणि रेस्टॉरंटस्मधील सर्व कर्मचार्‍यांच्या लसीकरणाची (vacccination) जबाबदारी मालकांवर सोपविण्यात येईल.
-लसीकरण झालेल्या ग्राहकांनाच रेस्टॉरंटस्मध्ये प्राधान्याने प्रवेश द्यावा, असे टास्क फोर्सने म्हटले आहे.

-व्यापार्‍यांची नाराजी लक्षात घेऊन दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवून दिली जावी.
-मात्र, त्यासाठी दुकानांमधील सर्व कर्मचार्‍यांचे लसीकरण होणे बंधनकारक करावे, असे टास्क फोर्सने अहवालात म्हटले आहे.
-पूर्ण लसीकरण (vacccination) झालेल्या कर्मचार्‍यांना दुकाने, कार्यालयांत येण्यास प्राधान्य दिले जावे, असे टास्क फोर्सने म्हटले आहे.

-कोरोना प्रतिबंधक लसीचे (corona vaccine) दोन्ही डोस घेतले तरी मुंबई लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची शक्यता तूर्त तरी नाही.
टास्क फोर्स (Task force) त्यास अनुकूल नाही, असे समजते.

Exit mobile version