अहमदनगर दि.11 डिसेंबर – एमआयएमच्या (AIMIM) वतीने इम्तियाझ जलील (Imtiyaz Jalil) यांच्या पुढाकाराने राज्यात तिरंगा रॅली काढायला सुरुवात केली आहे. मुस्लीम समाजाचे आरक्षण (Muslim reservation) आणि वक्फ बोर्डाची (Waqf Board) जमीन लाटल्याप्रकरणी एमआयएमने या मोर्चाचे आयोजन केले आहे.
(MIM’s tiranga rally in Mumbai; Vahili pays homage to the martyrs of Maratha reservation.)
मात्र, पोलिसांनी (Police) दबाव आणून एमआयएमची यात्रा थांबण्याचा प्रयत्न केला. मात्र, चांदिवली येथील शाळेत सभेला परवानगी मिळाली असून एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) सभा घेतील अशी माहिती औरंगाबादचे (Aurangabad) खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
शनिवारी सकाळी इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली (Tiranga Rally) औरंगाबादहून मुंबईसाठी रवाना झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबईमध्ये पोहचणार असा पवित्रा या रॅलीने घेतला आहे. त्यामुळे आता मुंबईच्या सीमेवर म्हणजेच मुलुंड चेकनाक्यावर पोलिसांचा (Police) मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मराठा आरक्षणातील हुतात्म्यांना वाहिली एमआयएम आदरांजली.
मुस्लीम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीसाठी एमआयएम मोर्चा काढण्यात येत आहे. एमआयएमच्या वतीने मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांचे कायगाव टोका येथील स्मारककावर श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. गोदावरी नदीवरील काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकावर मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएम मराठा आरक्षणातील हुतात्म्यांना श्रद्धांजली देताना जवळजवळ 300 गाड्यांचा ताफा थांबला होता.
अहमदनगरमध्ये (Ahemadnagar) हा मोर्चा अडवण्यात आला होता मात्र, नियमांचे उल्लंघन होणार नाही असे जलाल यांनी सांगितल्यावर हा मोर्चा पुढे सोडण्यात आला. मात्र, मुंबई पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिलेली नाही त्यामुळे पोलिसांच्या नियमांचे उलंघन करू नये असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी केले आहे.
मुंबईत आंदोलन आणि रॅलीला परवानगी नाही.
आज रात्रीपासून ते 12 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मोर्चे, आंदोलन आणि रॅलीला परवानगी नाकारण्यात आली आहे. या कालावधीत कोणत्याही आंदोलनाला परवानगी देण्यात येणार असल्याचं मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) स्पष्ट केलं आहे. एमआयएमच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत.