BEED24

Monsoon Panjab Dakh शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ; मान्सूनबाबत पंजाबराव डख यांचा खुलासा.

किल्लेधारूर दि.2 जून – Monsoon Panjab Dakh येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित शेतकरी मार्गदर्शन शिबिरात हवामान अंदाजक पंजाबराव डंख Monsoon Panjab Dakh यांनी 4 जून रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार असून 8 जून पर्यन्त पेरणी योग्य पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. Monsoon Panjab Dakh Important News for Farmers; Panjabrao Dakh’s disclosure about monsoon.

अगदी काही दिवसांवर खरीप हंगाम येवून ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड मध्ये शेतकरी मार्गदर्शन मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राजाभाऊ मुंडे, माजी नगराध्यक्ष स्वरूपसिंह हजारी, सभापती मंगेश तोंडे, उपसभापती सुनील शिनगारे, उद्योजक उदयसिंह दिख्खत यांची उपस्थिती होती. मार्गदर्शक म्हणून हवामान तज्ञ अभ्यासक पंजाब डख Monsoon Panjab Dakh तसेच सेवानिवृत्त कृषी अधिकारी वरिष्ठ कपाशी शास्त्रज्ञ रामेश्वर चांडक, सोयाबीन कृषी शास्त्रज्ञ कृष्णा कर्डीले यांची उपस्थिती होती. यावेळी पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की येत्या 4 जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असून 8 जून पर्यन्त सर्व महाराष्ट्र व्यापला जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. बहुतांश भागात पेरणी होईल असे यावेळी डख यांनी सांगीतले. यावेळी गतवर्षी च्या तुलनेत चांगला पाऊस होण्याचे भाकीत त्यांनी वर्तवले. आपल्या अनेक संस्कार हे संस्कृती बरोबर निसर्गाशी जोडलेले आहैत. विजा चमकत असताना कुठे पडू शकतात, काय सुरक्षिता पाळावी हे सांगीतले. पर्यावरणाला भिऊ नका मी कायम खरी माहीती सांगण्या साठी सोबत आहे असे सांगीतले.

यावेळी सोयाबीन तज्ञ कृष्णा कर्डीले यांनी बोलताना जिल्ह्यात चार गोष्टीत वाढ होत आहे. त्यामध्ये तापमान बदलतय , आद्रता, वारा व वाऱ्याची गती वाढत आहे, शेतकरी आत्महत्या वाढत आहे हे गंभीर असून सोयाबीन उत्पादनात स्थैर्य आल असल्याचे कर्डीले म्हणाले. कुठल्या एक बियाणाचे मागे लागू नका जमीनेची प्रतवारी नुसार निर्णय घ्या. मिश्र पध्दतीचे हवामान अंदाज पिकासाठी धोकादायक आहेत. बांधसफाई करा होमणी किड होण्याची शक्यता दक्षता घ्या असेही कर्डीले यांनी सांगीतले. वरीष्ठ कापूस उत्पादक रामेश्वर चांडक यांनी यावेळी बोलताना कापूस लागवडी बद्दल मार्गदर्शन केले. कुठला लावलाय या पेक्षा जो लावलाय त्याला जीव लावा. चुका दुरूस्त करा व उत्पादन वाढवण्याचे काम करा. योग्य वेळी योग्य काम करा. उत्पादन वाढीसाठी वापरायचे तंत्रज्ञान सांगीतले. अंतरपिकावर भर द्या असे चांडक म्हणाले. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी, राजाभाऊ मुंडे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक माजी सभापती महादेव तोंडे यांनी तर सुत्रसंचलन सदाशिव थोरात व आभार ॲड. मोहन भोसले, संचालक संदीप शिनगारे यांनी मानले. यावेळी बाजार समिती आवारातील सिंमेट रोड व शेतकऱ्यांसाठी स्वच्छ पिण्याचे पाण्याचे प्लान्टचे उदघाटन करण्यात आले. आदर्श शेतकऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व संचालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Exit mobile version