BEED24

तालुकाध्यक्षांच्या बंडखोरीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या तिखट प्रतिक्रिया…

किल्लेधारूर दि.१२ (वार्ताहर )पदवीधर मतदारसंघात Aurangabad graduates constituency राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP उमेदवार निश्चीत असताना तालूकाध्यक्ष यांनी कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण करणारे कृत्य करण्यापेक्षा पक्षाच्या तालूकाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन आपला वैयक्तिक निर्णय घ्यावा पक्षात गैरसमज पसरविणारे निर्णय पदावर असताना घेऊ नयेत अशी तिखट प्रतिक्रिया धारूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते सुधिर शिनगारे व इतर कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

सध्या पदवीधर मतदार संघात Aurangabad graduates constituency अर्जभरणी सुरू आहे व राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतीनीधीत्व करणारे कार्यक्षम आ.सतिशभाऊ चव्हाण यांना राष्ट्रवादी पक्षाने NCP उमेदवारी जाहीर केली आहे. निष्ठावंत पक्षाचे कार्यकर्ते जोमाने व विक्रमी विजयासाठी परीश्रम घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP धारूर तालूका अध्यक्ष यांनी पक्ष श्रेष्ठीचा विचार न घेता स्वतःचे कार्य किरकोळ असताना कुठलीही तयारी नसताना या मतदारसंघात अर्ज दाखल करून कार्यकर्त्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम केले आहे. पक्षात जबाबदार पदावर असताना बंडखोरी करून पक्षाचे व पक्ष श्रेष्ठीची ध्येय धोरणे धुळीस मिळवली आहेत. त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा व निवडणूक लढवावी स्वतःची किंमत पहावी आणि पक्षाचे निष्ठावंत स्थापनेपासून जिवाचे रान करणारे कार्यकर्त्याना त्यांच्या या भुमिके मुळे ठेच पोहचली आहे. त्यांनी वरीष्ठाना विचारात न घेता अवैचारीक पणे हा निर्णय घेतला आहे. त्यांनी तात्काळ पक्षाच्या तालूकाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी निष्ठावंत कार्यकर्ते सुधिर शिनगारे व इतर कार्यकर्त्यांनी केली आहे.

Exit mobile version