BEED24

आज पासून लातूर जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी; काय आहेत नवीन निर्बंध

लातूर दि,15 मार्च – कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहेत. मराठवाड्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. लातूर जिल्हाही कोरोना रुग्णांच्या संख्येने हादरला आहे. संख्या रोजच वाढत असल्यामुळे येथील प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक नियम आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी यांनी नव्याने आदेश काढत रात्रीची संचारबंदी व आठवडे बाजार बंदचा निर्णय घेतला आहे.

(Night curfew in Latur district from today; What are the new restrictions)

सोमवार दि.१५ मार्चपासून लातूर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या हद्दींमध्ये रात्रीची संचारबंदी (Night curfew) लागू करण्यात आली आहे. हा कर्फ्यु रात्री ८ ते पहाटे ५ पर्यंत असेल. येत्या ३१ मार्चपर्यंत आठवडी बाजार देखील पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सध्या लातूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा (Corona Positive) आकडा २६९२७ वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत ७१६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी आतापर्यंत २५२४५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. लातूरमध्ये सक्रिय कोरोना रुग्णांची (Active patients) संख्या ९६२ वर पोहोचली आहे.

जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशाप्रमाणे लातूरमध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतच्या तीन किलोमिटरच्या त्रिज्येत रात्री ८ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर ३१ मार्चपर्यंत सर्व आठवडी बाजार बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, लातूर (Latur) जिल्ह्यात देखील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे येथील जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. (Collector Pruthviraj B.P.) यांनी रात्रीची संचारबंदी (Night curfew) जाहीर केली आहे.

लग्नकार्यासाठीसुद्धा ५० पेक्षा जास्त लोक जमल्यास कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान संचारबंदी लागू केलेल्या या भागात सर्व अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. तसेच या भागात धार्मिक विधींना केवळ पाच लोकांना उपस्थित राहता येणार आहे. धार्मिक कार्यक्रम, मोर्चे, आंदोलने अशा कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत बंदीचे नवीन निर्बंध (restrictions) असणार आहे.

दरम्यान, लातूर (Latur) शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची (Corona Positive) संख्या झपाट्याने वाढत असताना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन करुनही अनेक ठिकाणी नागरिकांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. लातूर येथील जिल्हा प्रशासनासह आरोग्य प्रशासन कोरोनाला आळा घालण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. मात्र, यंत्रणेला म्हणावे तेवढे यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. (Collector Pruthviraj B.P.) यांनी नागरिकांकडून नियमांचे होत असलेले उल्लंघन लक्षात घेता रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version