मुंबई दि.28 सप्टेंबर – सोमवारी चक्रीवादळ (Hurricane) निवळले आणि त्याचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. हे क्षेत्र सध्या छत्तीसगड आणि ओडिसाच्या दक्षिणेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार पाऊस होत असून पुढचे 48 तास अतिवृष्टीचा धोका कायम आहे. यासोबतच अरबी समुद्रात आणखी एक चक्रीवादळ (Cyclonic storm) येण्याची शक्यता असून पश्चिम किनारपट्टीवर मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने (weather department) वर्तवली आहे.
(Oh my God … the next 48 hours are dangerous; The possibility of a new storm.)
आज दि.28 सप्टेंबरला ठाणे, रत्नागिरीसह कोकण विभागात आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीची (heavy rain) शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात (Marathwada) पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहून अनेक भागांत मुसळधारांचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे.
10 जिल्ह्यांना ‘ ऑरेंज अलर्ट’
मुंबई, सिंधुदुर्ग, नंदुरबार, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड (Beed), परभणी आणि हिंगोली या 10 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट (Orange alert) दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे 28 सप्टेंबरपासून पुढील 1 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळणार आहे. येथील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर बहुतांश ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यासाठी इशारा
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्य़ांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ‘मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, नगर, नंदुरबार, औरंगाबाद (Aurangabad), जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्य़ांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर (Latur), उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्य़ांतही पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.