BEED24

धक्कादायक…. एकाच कुटूंबातील तीघांची धारदार शस्त्राने हत्या, एक बालक गंभीर

सहा वर्षाचा मुलगा मृत समजून सोडून दिल्याने बचावला , पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली….

औरंगाबाद दि.२८- (प्रतिनिधी) संपूर्ण कुटुंब संपविण्याच्या उद्देशाने आज मध्यरात्री अज्ञात मारेकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तीघांची धारदार शस्त्राने हत्या (Murder) करण्यात आली असून या हल्ल्यात सहा वर्षाचा मुलगा मृत समजून सोडून दिल्याने बचावला आहे. गंभीर जखमी मुलास औरंगाबाद (Aurangabad) येथे उपचारासाठी हलविण्यात आले असून या घटनेमुळे पैठण शहरात खळबळ उडाली आहे.

पैठण (Paithan) शहरात नाथमंदीरा पाठीमागील गोदावरी काठावर वसलेल्या जुने कावसन या गावात शनिवारी मध्यरात्री हे थरार घडले. पती, पत्नी व मुलगी अशा तीन जणांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या (Murder) करण्यात आली. यात राजू निवारे (४०), आश्विनी राजु निवारे (३५) व मुलगी (१०) यांचा खुन (Murder) झाला आहे. मारेकऱ्यांनी निवारे कुटुंबातील सहा वर्षाचा मुलगा सोहम निवारे याच्यावरही वार केला, मारेकऱ्यांनी मृत समजून सोडून दिल्याने तो बचावला असून गंभीर अवस्थेत त्यास उपचारासाठी औरंगाबाद (Aurangabad) येथे हलविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस (Police) उपाधिक्षक गोरख भामरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार, फौजदार छोटुसिंग गिरासे यांनी तातडीने भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आली आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस (Police) निरीक्षक भागवत फुंदे यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे पैठण (Paithan) शहरात खळबळ उडाली आहे.

Exit mobile version