मुंबई दि.27 एप्रिल – राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन (lockdown) लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, लगेच लॉकडाऊन उठवला जाणार नसून कोरोनावर पूर्णपणे मात करण्याच्या प्रयत्नात लॉकडाऊन वाढण्याचे संकेत महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांकडून मिळाले आहेत.
(Signs of increasing lockdown; Information of Minister Vijay Vadettiwar, Chhagan Bhujbal and Uday Samant.)
मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ आणि उदय सामंत (Vijay Vadettiwar, Chhagan Bhujbal and Uday Samant) या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार आता लॉकडाऊन (lockdown) वाढवण्याच्या तयारीत आहे, असे संकेत दिले आहेत. गेल्या 14 एप्रिलला मुख्यमंत्र्यांनी राज्यात कडक निर्बंध लावले होते. पण परिस्थिती जैसै थे होती. कडक निर्बंधातही नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने दि. 22 एप्रिलपासून पुढील 15 दिवस लॉकडाऊनला सुरुवात झाली. 1 मे च्या सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन जाहिर करण्यात आलेला आहे.
गेली काही दिवस सतत वाढणारी कोरोना बाधितांची संख्या दोन दिवसांपासून बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. परंतू तिसरी लाट येण्या आधी सरकारला राज्यात बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. ज्यात सर्वात प्रथम लसीकरण, आयसीयू बेड्सची संख्या वाढवणे व जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठ्याचा समावेश आहे. त्यासाठी लॉकडाऊन गरजेचं असल्याचं मत महाविकास आघाडीतले नेते करत आहेत.
कॅबिनेट (Cabinet) बैठकीत लॉकडाऊन वाढवायचा की नाही याची प्राथमिक चर्चा केली जाईल. यामध्ये शहरनिहाय कोरोना बाधितांची (Corona Positive) आकडेवारी समोर मांडली जाईल, लॉकडाऊनचा किती परिणाम सध्या होतोय आणि वाढवला तर किती परिणाम होईल यावर सगळं अवलंबून आहे. लॉकडाऊनमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात भार पडतोय. पण रुग्णसंख्या कमी करण्यात मोठी मदत होत आहे.
1 मे पासून 18 ते 44 वर्ष वयोगटासाठी लसीकरण (Vaccination) सुरु करायचं आहे, राज्यात सध्या 4 हजार लसीकरण केद्र आहेत ते दुप्पटीनं वाढवायचे आहेत, 18 ते 44 पर्यंत साधारणत: साडेपाच कोटींच्या घरात संख्या आहे. लसीकरण (Vaccination) केंद्रांवर गर्दी होऊ नये यासाठी सरकारला नियोजन करायचे आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवलं तर नक्कीच याचा परिणाम राज्यातली कोरोनाची परिस्थिती सुधारण्यावर होईल असे मत मंत्र्यांकडून व्यक्त केले जात आहे.
दुसऱ्या लाटेतून जाताना महाराष्ट्राला चांगलेच चटके बसले आहेत. राज्य आतापासूनच तिसऱ्या लाटेची तयारी करत आहे, लॉकडाऊन वाढवला तर कोरोना बाधितांची (Corona Positive) आकडेवारीसह कोरोनासाठी लागणारी साधनसामुग्री वाढवतां येईल. यासाठी हा लॉकडाऊन महत्वाचा मानला जातोय, जर पुन्हा लॉकडाऊन उघडण्याची घाई केली तर राज्यात मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता नाकारतां येत नाही. त्यामुळे आता राज्याचे नेते कॅबिनेटमध्ये (Cabinet) काय निर्णय घेतायत याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.