BEED24

रविवारची संख्या अकरा हजार….. कोरोनाच्या चढत्या आलेखाने केंद्र सरकारही सतर्क

मुंबई दि.8 मार्च- कोरोनाचा प्रादुर्भाव राज्याच्या सर्वच भागात गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेला दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट येेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश दिले आहेत. सध्या कोरोनाची आकडेवारीही वाढताना दिसत आहे. आजची आकडेवारीही धक्कादायक आहे. वाढत्या कोरोना आलेखाने केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

(Sunday’s number is eleven thousand. The central government is also wary of Corona’s rising graph)

रविवारी महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात आज 1,11,41 कोरोना बाधीत (Corona Positive) रुग्णांची वाढ झाली आहे. तर 40 मृत्यूची नोंद झाली आहे. रविवारी राज्यात नवीन 6,0,13 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 20,68,044 रुग्णांना दवाखान्यातून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहेत. सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) एकूण 97,983 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आता 93.17% झालं आहे. त्यासोबत पुणे जिल्ह्यातीलही आकडेवारी वाढत्या आलेखाप्रमाणे आहे.

पुण्यात सध्या 341 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह (Corona Positive) रूग्णसंख्या 2,08,330 इतकी आहे. तर पुण्यात 6689 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patients) आहेत. आत्तापर्यंत एकूण 4890 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 1,96,751 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर आज 6743 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊनमध्ये (lockdown) आठवड्याच्या प्रत्येक शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात अशा प्रकारचं अंशत: लॉकडाऊन (lockdown) राहणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय घोषित केला आहे.

Exit mobile version