मुंबई : दि.3 मार्च- राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, अशी शक्यता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या वक्तव्यामुळे वर्तवली जात आहे. कोरोनामुळे हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
(Tenth and twelfth examinations will not be held – Education Minister Varsha Gaikwad)
राज्यातील विविध भागांमध्ये शाळा सुरू केल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाल्याची माहिती समोर आली आहे. दिवसेंदिवस वेगवेगळ्या शाळा व वस्तिगृहात विद्यार्थ्यांना बाधा होण्याची शृंखला सुरुच आहे. त्यामुळे राज्य सरकार आता खबरदारी म्हणून दहावी-बारावीची लेखी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शासनाने तंत्रशिक्षण विभागाच्या परिक्षा अॉनलाईन घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या परिक्षावर मात्र अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. नुकताच तामिळनाडू राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे (Corona Positive) दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही असा निर्णय घेतला जाऊ शकतो. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.