BEED24

मोठी बातमी … आता दुकानांची वेळ रात्री 8 पर्यंत.

मुंबई दि.2 अॉगस्ट – गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना संकटामुळे लावलेले निर्बंध हळूहळू शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कालच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी ज्या ठिकाणी कोरोनाचे प्रमाण कमी आहे तिथे निर्बंध शिथिल करण्याबाबत सूचना दिली होती. या आदेशावर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त येत आहे.

(The big news … now shop hours until 8 p.m.)

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री आठ वाजे पर्यंत दुकानं सुरु ठेवण्याचे निर्णय घेतला आहे. यासाठीचा जीआर काढण्यात येत आहे. सध्या राज्यातील सर्व जिल्हे तिसऱ्या लेवलमध्ये ठेवून दुकाने 4 वाजे पर्यंतच सुरु आहेत. दोन दिवसांपुर्वी 25 जिल्ह्यात निर्बंध शिथिल करत 11 जिल्ह्यांना वगळण्याचा प्रस्ताव टास्क फोर्सने सादर केला होता. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत दुकानांची वेळ वाढवण्याबाबतची माहिती दिली.

सध्या सकाळी 7 ते दुपारी 4 वाजे पर्यंतच दुकाने सुरु आहेत. दुकाने सुरु असण्याची वेळ वाढवावी अशी मागणी राज्यभरातून व्यापारी बांधवांकडून करण्यात येत होती. याबाबत टास्क फोर्सच्या (Task force) अहवालानुसार निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे राज्यात आता दुकाने 8 वाजे पर्यंत सुरु असणार असे आदेश आज काढण्यात येणार आहेत. यामुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

परंतु ज्या ठिकाणी कोरोनाचे प्रमाण कमी आहे त्याच ठिकाणी हे आदेश लागू होतील. ज्या ठिकाणी अद्याप कोरोनाचे प्रमाण वाढतंच आहे अशा रुग्णांची संख्या वाढ असणाऱ्या ठिकाणी लावण्यात आलेले निर्बंध (restrictions) कायम असणार असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 11 जिल्हे वगळून 25 जिल्ह्यात आता दुकाने सुरु ठेवण्याची वेळ रात्री 8 पर्यंत होणार आहे.

Exit mobile version