BEED24

संविधान हा भारताचा मौलिक ग्रंथ – अजिंक्य चांदणे

गेवराई दि २९ ( वार्ताहर) भारताचे संविधान हे सर्वोश्रेष्ट असुन मौलिक ग्रथं आहे. जगाच्या पाठीवरती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हे आम्हाला दिले असुन प्रत्येकाला समानतेची वागणूक व धर्मनिरपेक्ष असनारे मोलाचे संविधान या भारत देशाला अर्पण केले आहे. यात कुठलाही भेदभाव त्यांनी केला नाही म्हणूनच आपल्या देशात लोकशाहीचे राज्य असुन सर्वजन गून्यागोंविदाने राहतात असे प्रतिपादन डिपीआय चे प्रदेश अध्यक्ष तथा व्याख्याते अंजिक्य चांदणे यांनी केले आहे .

गेवराई शहरातील सर्व सामाजिक संघटनेच्या वतिने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये संविधानाची प्रस्ताविका लावून तसेच संविधानावर व्याख्याना कार्यक्रम येथील गटशिक्षण अधीकारी कार्यलयात पार पडला यावेळी ते बोलत होते. यावेळी  व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबादास पिसाळ , सय्यद एजाजोद्दीन ॲड.भगवान कांडेकर , मोमिन , कंडूदास कांबळे , पि.टी. चव्हाण , अण्णासाहेब लोनके , अण्णासाहेब राठोड , बंडूभाऊ बारगजे , विनोद सौंदरमल , संजय सुतार , मनोहर चाळक , अॅड सुहाष निकम , संजय सुतार यांची उपस्तिथी होती.पुढे बोलताना ते म्हणाले की जगात असा कोणताही देश नाही तिथले कायदे हिसंक आहेत. हाताच्या मोबदल्यात हात आणी जिवाच्या मोबदल्यात जिव असे वातावरण आहे. या देशातली ठराविक मंडळी हे संविधानात हस्तक्षेप करून संविधानाला नष्ट करायचे कुटील कटकारस्थान रचत आहेत. परंतू आमचे सांगणे आहे अश्या निच वृत्तीला जोपर्यंत या देशातील तूमच्या आणी आमच्या सारखे संविधान प्रेमी जिवंत आहेत तो पर्यंत याचा अंजेडा आम्ही हानुन पाडल्याशिवाय राहनार नाहीत. प्रत्येक घरात संविधान पोहचले पाहिजे प्रत्येकाला यांची किंमत कळाली पाहिजे संविधान टिकले तर तूम्ही आम्ही टिकू तसेच यादेशात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुचे दहन करूण आम्हाला ही मौलिक घटना दिली . यात त्यांनी सर्वांना अधिकार दिले आहे शासकीय यंत्रणेत काम करणा-या माता भगिनीनां नऊ महिन्याची रजा दिली व एवढंच नाही तर जगाच अर्थकारण करणा-या भारतीय रिर्जंव बॅंक ऑफ इंडिया ही केवळ संविधानावर चालनारी यंत्रना आहे याचं उदारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लम ऑफ रूपीज नावाच्या त्यांच्या पुस्तकात लिहीले आहे आपण जेवढा या संविधाना प्रचार आणी प्रसार करू तेवढे यांचे सुर्यासारखे तेज आपल्याला बघायला मिळे तसेच भारतातल्या प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे त्यांनी संविधानाबाबद जनजागृती करावी असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवाजी डोंगरे , अजयकुमार पप्पू गायवाड , अॅड सोमेश्वर कारके , सय्यद माजेद , आणा राठोड ,बबु बारुदवाले ,पिएस राऊत , रंजनी सुतार , अमोल सुतार , गोपाल चव्हाण, रंजीत शिंदे , अजय खरात , मुन्ना पाडमुखे , राजू गायवाड , बाबा घोडके , प्रा शरद सदाफूले , प्रा हेमंत सौंदरमल , गौतम कांडेकर , बाबा निकाळजे , किशोर भोले , विशाल वक्ते , सतिष प्रधान , यांच्यासह असंख्य संविधान प्रेमी उपस्थित होते .

संविधान प्रस्ताविकेचे तहसिलदार यांच्या हस्ते अनावरण
शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेच्या फलकाचे मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात गेवराईचे तहसिलदार सचिन यांनी फित कापुन यांचे अनावरण केले तसेच त्यांच्यासमवेत गटविकास अधिकारी अनिरूद्ध सानप , गटशिक्षण अधिकारी मिंलीद तुरूकमारे , बालविकास प्रकल्प अधिकारी सुनिल थोरात , कृषी अधिकारी राठोड साहेब मंडळ अधिकारी तांबे , तलाठी पांढरे हे उपस्थित होते .

Exit mobile version