मुंबई दि.17 जून – राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आढळत आहे. देशभरासह राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे (Second wave of corona) संकट आता हळूहळू कमी होत आहे. अनलॉक प्रक्रियेला सुरूवात होऊन निर्बंधामध्ये सूट देण्यात आलीये. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन, याबाबत निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान, राज्यात दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
(The number of patients in the state increased; The death toll in the second wave is higher.)
महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात पुन्हा एकदा नव्या कोरोना बाधितांचा (Corona Positive) आकडा 10 हजारांपार गेला आहे. गेल्या 24 तासात राज्यात 10 हजार 107 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, गेल्या २४ तासात राज्यात 10 हजार 567 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 56,79,746 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण बरे झाले आहेत.
यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट हा 95.7 टक्के इतका झाला आहे. ही एक निश्चितच दिलासादायक बाब महाराष्ट्रासाठी आहे. राज्यात सध्या एकूण 1,36,661 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात गेल्या 24 तासात 237 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची (Corona death) नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.94 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,86,41,639 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,34,880 (15.36 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,78,781 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,401 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान, गेल्या 24 तासात नोंद झालेल्या एकूण 237 मृत्यूपैकी 144 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 93 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू (Corona death) कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे.
दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण अधिक.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Second wave of corona) चार महिन्यांत 60 हजारांहून अधिक कोरोनाबळींची नोंद झाली आहे. पहिल्या लाटेत 2 लाख 48 हजार 802 रुग्णांची नोंद झाली हाेती, तर 51 हजार 360 मृत्यू झाले.
आतापर्यंत महाराष्ट्रात 1 लाख 14 हजार 154 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील जवळपास अर्धे मृत्यू हे 15 फेब्रुवारीनंतरचे आहेत. काेरोनाच्या दुसऱ्या लाटेत हे मृत्यू झाले आहेत. देशभरात होणाऱ्या काेरोना मृत्यूंपैकी 20 टक्क्यांहून अधिक मृत्यू महाराष्ट्रात (Maharashtra) झाले आहेत. एकंदरीत भारतामध्ये आजपर्यंत झालेल्या 3.4 लाख काेरोना मृत्यूंपैकी 30 टक्के राज्यातील आहेत.