BEED24

या तारखेला लागणार बारावीचा निकाल… आज शिक्षणमंत्री बोलण्याची शक्यता.

पुणे दि.20 जुलै – राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाने नुकताच दहावीचा निकाल जाहिर केला असून आता बारावीचा निकाल (12th result) कधी लावणार याकडे लक्ष लागले आहे. राज्याच्या शिक्षण मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यातच बारावीचा निकाल (HSC result) जाहीर होणार आहे. हा निकाल येत्या काही दिवसातच लागण्याची शक्यता आहे. याबाबत राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आदल्या दिवशी अधिकृत माहिती देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

(The result of class XII will be on this date … Possibility of the Education Minister speaking today.)

महाराष्ट्र राज्याचा बारावीचा निकाल (HSC result) येत्या 21 जुलैला लागण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यापूर्वी 4 ऑगस्टपर्यंत हा निकाल लागू शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (Corona outbreak) दहावी आणि बारावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे बारावीचा निकाल उशिरा लागत आहे.

बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र अखेर बारावीची परीक्षा (HSC Exam) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दहावीप्रमाणे बारावीचा निकालही विशेष मूल्यांकन (evaluation) पद्धतीनं (Special Assessment system) लावण्यात येणार आहे. 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार निकाल लावण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावी आणि अकरावीच्या मार्कांना प्रत्येकी 30 टक्के महत्व आहे. तसेच बारावीच्या वर्षांतील अंतर्गत परीक्षा (intranal) , असायन्मेन्टस यांना 40 टक्के महत्व असणार आहे. यावरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे.

दहावीच्या निकालादरम्यान विद्यार्थ्यांना निकाल बघताना ओव्हरलोड झाल्यामुळे साईट क्रॅश झाली होती. ही अडचण बघता बारावीच्या निकालाच्या (12th result) दिवशी अशी कोणतीही तांत्रिक अडचण विद्यार्थ्यांना येणार नाही असा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे. बारावीच्या निकालाबाबत शिक्षण मंडळाकडून अजूनही अधिकृत तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. पण जर 21 तारखेला जर निकाल जाहीर होणार असेल तर आज दुपारपर्यंत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) या संदर्भात माहिती देण्याची शक्यता आहे.

Exit mobile version