BEED24

लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे संकेत; 1 जून नंतर काय ?

मुंबई दि.22 मे – कोरोना संसर्गाच्या (Corona infection) पार्श्वभूमीवर राज्यात 1 जून 2021 सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाऊन (lockdown) आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांचा आलेख उतरणीला आल्याचं चित्र आहे. त्यातच ‘ब्रेक द चेन’ (Break the chain) अंतर्गत शिवभोजन थाळी आता 14 जूनपर्यंत मोफत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांनी घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊन 1 जूनला संपणार, वाढणार की निर्बंध हळूहळू शिथील होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

(This is the indication given by the Chief Minister regarding the lockdown; What after June 1?)

तर दुसरीकडे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनमधून (lockdown) काहीशी सूट मिळेल, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनबाबत आता काय निर्णय होतो याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

मुख्यमंत्री काय म्हणाले?
लॉकडाऊनबद्दल बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) म्हणाले की, “लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. या निर्णयाला चारच दिवस झाले आहेत. कोरोनाची स्थिती आटोक्यात आलेली नाही. सध्याच्या लॉकडाऊनचे परिणाम काय होतात हे पाहून पुढील निर्णय घेऊ. सध्याची परिस्थिती पाहता लवकरच आढावा बैठक होईल. या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर संचारबंदीमध्ये सूट देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल.”

“मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या कमी झाली आहे. परंतु ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांमध्ये घट झालेली नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता ऑक्सिजनचा योग्य पुरवठा आवश्यक आहे,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन
राज्यात कोरोना संसर्गाने (Corona infection) पुन्हा डोकं वर काढल्यानंतर सुरुवातीला 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत कडक निर्बंध जारी केले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे हे निर्बंध 15 मेपर्यंत वाढवण्यात आले. अशातच राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आल्यानंतर लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार राज्यात 1 जूनपर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत निर्बंध लागू आहेत. यापूर्वी लागू असलेले निर्बंध कायम असून काही नव्या नियमांचा समावेश करण्यात आला आहे.

14 जून 2021 पर्यंत मोफत शिवभोजन थाळी
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ Break the chain) प्रक्रिया संपूर्ण राज्यभर राबवली जात आहे. या काळात राज्यातील गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत यासाठी 15 एप्रिल 2021 पासून शिवभोजन योजनेअंतर्गत मोफत थाळी दिली जात आहे. ही मुदत आता आणखी एक महिन्यासाठी वाढवण्यात आली असून 14 जून 2021 पर्यंत मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध होईल. अन्न व नागरी पुरवठा विभागाने यासंबंधीचा शासननिर्णय जारी केला आहे. आतापर्यंत 48 लाख 44 हजार 709 नागरिकांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे.

Exit mobile version