जालना: दि.१०- घरासमोरील अंगणात खेळणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींना भरधाव कंटेनरने (container) चिरडल्याची दुदैर्वी घटना बुधवारी दुपारी जालना- सिंदखेडराजा मार्गावरील नाव्हा शिवारात घडली. यात सख्ख्या बहिणी असलेल्या दोन्ही मुलींचा मृत्यू (Death) झाला.
धारकल्याण येथील सुमय्या शेख व शाहिन शेख या दोन बहिणी काही दिवसांपूर्वी आजीकडे नाव्हा या गावी गेल्या होत्या. त्या दोघी बुधवारी दुपारी नाव्हा येथील घरासमोर खेळत होत्या. त्यावेळी नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनर (container) (क्र. एन. एल. ०२- के. ८४६२) चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर त्या मुलींच्या अंगावर गेला. कंटेनरने (container) चिरडल्याने गंभीर जखमी झालेल्या दोन्ही मुलींचा जागीच मृत्यू (Death) झाला. सुमय्या (८) व शाहिन शेख सलीम (७) (रा. धारकल्याण ता. जालना) अशी मयत मुलींची नावे आहेत. अपघातानंतर कंंटेनर (container) चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर मयत मुलींच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस (Police) ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणात पोलिसात (Police) गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.