किल्लेधारूर दि.१२ (वार्ताहर ) धारूर घाट Dharur Ghat हा राष्ट्रीय महामार्ग झाला माञ घाटाचे रुंदीकरण न झाल्याने रोजच अपघात सुरू आहेत गुरूवारी औषधे घेऊन जाणारे पिकप घाटात पलटी झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. रोज अपघात होत असताना रस्त्याच्या कामा कडे रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष असल्याने वाहन धारक माञ वैतागून गेले आहेत.
धारूर ते तेलगाव राज्य रस्ते विकास महामंडळा कडून राष्ट्रीय महामार्गाचे 548 सी चे काम होताना धारूर Dharur शहरातील डॉ.आंबेडकर चौक ते धुनकवड पाटी पर्यंत चे रस्त्याचे रुंदीकरण न करता आहे त्या रस्त्या वर फक्त डांबरीकरण करून रस्ता चकाचक करण्यात आला. मात्र यामध्ये चार ते पाच कि.मी.घाट Ghat असताना घाटात रस्ता रुंदीकरण नाही, दरीचे बाजूचे कठड्याची उंची न वाढवता फक्त डागडूजी व रंगरंगोटी करण्यात आली. यामुळे वाहनाचा वेग वाढला व अपघाताचे प्रमाण वाढले दरीत वाहन कोसळण्याचे प्रमाण वाढले. अपघात तर नियमीतचे झाले. यामुळे वाहतूक कित्येक तास खोंळबने हे प्रकार नियमीतचे झाले. गुरूवारी हि अपघाताची मालीका सुरूच राहीली. घाटात अवघड वळणावर एम एच 15 जी व्ही 6058 हे नाशिक कडून केज ला जाणारे, केज वरून धारूर च्या घाटातून बीड कडे पिकावरील औषधे घेऊन जाणारा पिकप घाटात पलटी झाला. चालकाला किरकोळ मार लागला व औषधांचं नुकसान माञ मोठ्या प्रमाणात झाले. यामुळे वाहतूक माञ खोंळबली होती. हे वाहन क्रेनच्या सहाय्याने उभा करावा लागला. पिकअप काढल्या वर वाहतूक सुरळीत झाली. या रोजच्या अपघाता मुळे यारस्त्याने जाता येताना माञ जिव मुठीत घेऊन नागरीक वाहतूक करत आहेत.