औरंगाबाद दि.10 मार्च- लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता चार अधिकारी लॉकडाऊन (lockdown) सारखा कठोर निर्णय घेत आहेत. तर मग औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील एआयएमआयएमचे (AIMIM) खासदार आमदार लोकप्रतिनिधी काय गोटया खेळण्यासाठी आहेत का? असा संतप्त सवाल खासदार इम्तियाज जलील (Imtiyaaz Jalil) यांनी एका बैठकीत केला आहे. याप्रसंगी बोलताना त्यांनी लॉकडाऊन नको मात्र निर्बंध घाला अशी मागणी केली आहे.
(Why are we going to play Gotya? Angry question about MP’s lockdown)
औरंगाबाद (Aurangabad) येथील वाढत्या कोरोना प्रादुर्भाव रोकण्यासाठी रविवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स ची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मनपा आयुक्त तथा प्रशासक अस्तिककुमार पांडेय, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील त्याचबरोबर विविध विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत अंशतः लॉकडाउन करण्याचा निर्णय झाला तो जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी जाहीर केला.
अंशतः लॉकडाऊन (lockdown) मध्ये अनेक निर्बंध घालण्यात आले. यात आठवडी बाजार बंद, जाधववाडी मंडी बंद, विवाह सोहळे पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे. या बैठकीमध्ये कुठल्याही राजकीय नेत्याला व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आले नाही. यामुळे एआयएमआयएमचे (AIMIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiyaaz Jalil) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे चार अधिकारी लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता लॉकडाऊन सारखा निर्णय घेत आहेत. त्याच बरोबर कोर्टमॅरेज सारखा सल्ला देत आहेत, मात्र कोर्टमॅरेज साठी एक महिन्याचा अवधी लागतो त्यामुळे ज्या प्रमाणे जिल्ह्यात कंपन्या सुरू आहेत त्याप्रमाणे निर्बंध घालून विवाहदेखील काही अटी व शर्ती वरती सुरू ठेवणे गरजेचे आहे अशी मागणी खासदार जलील यांनी केली. तर लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नाही तर आम्ही काय गोटया खेळण्यासाठी आहोत की काय? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
या अधिकाऱ्यांची कोरोना व्हायरसशी (corona virus) बैठक झाली का?
या बैठकीमध्ये शनिवारी आणि रविवारी संपूर्णतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लॉकडाऊनला विरोध दर्शवत खासदार इम्तियाज जलील यांनी या चार अधिकाऱ्यांची कोरोना वायरसशी (corona virus) बैठक झाली आहे की काय असा टोला लगावला. ज्या लोकांना लग्न कार्य करायचे असतील त्यांना आम्ही सहकार्य करू असे देखील जलील यांनी यावेळी सांगितले.