BEED24

चिंताजनक… महाराष्ट्रात बुधवारी कोरोनाचा विस्फोट; आकडा 23 हजाराच्या पुढे

मुंबई दि.17 मार्च – आज बुधवारी महाराष्ट्राची (Maharashtra) चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्ग (Corona virus) होण्याचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना संसर्गाचा (Corona virus) दिवसेंदिवस वाढणारा वेग आणि लोकांनी केलेले दुर्लक्ष यामुळे राज्याला गंभीर परिणामाचा सामना करावा लागणार आहे. दररोज मोठ्या संख्येने करोना बाधित (Corona Positive) आढळून येत असून, मृत्यूंच्या संख्येतही भर पडत आहे. ही परिस्थिती पाहता आता राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. आज बुधवारी दिवसभरात राज्यात २३ हजार १७९ नवीन करोना बाधित (Corona Positive) वाढले असून, ८४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

( Worrying.. Corona blast in Maharashtra on Wednesday; The number is beyond 23 thousand)

वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनेक शहारांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. याशिवाय, लसीकरणाचा वेग आणखी वाढवणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. आज दिवसभरात राज्यात २३ हजार १७९ नवीन करोना बाधित आढळले असून ८४ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात एकुण ५३ हजार ८० रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर २.२४ टक्के एवढा आहे. याशिवाय, महाराष्ट्रात (Maharashtra) आज रोजी एकूण १,५२,७६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज ९ हजार १३८ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत एकूण २१,६३,३९१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९१.२६ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७८,३५,४९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,७०,५०७ (१३.२९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,७१,६२० व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. तर ६ हजार ७३८ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत.

आता दिवसाकाठी तीन लाखांच्या गतीने लसीकरण करण्याचा निर्धार – राजेश टोपे
दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज राज्यातील लसीकरण कार्यक्रमाबद्दल जनतेला माहिती दिली. “आज करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी एकूण १८८० सेंटर महाराष्ट्रात मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत आपण ३३ लाख ६५ हजार ९५२ एवढ्या लोकांना लसीकरण करण्यात आलेलं आहे. या लसीकरणाचा समाजातील घटकांमध्ये आरोग्य कर्मचारी, आघाडीच्या फळीतील कर्मचारी, ६० पेक्षा अधिक वय असणारे व्यक्ती व ४५ पेक्षा जास्त वय असलेले कोमॉर्बिड लोकांचा समावेश आहे.

या सर्वांमध्ये आपण जर आज बघितलं तर २ लाख ३२ हजार ३४० एवढं कालचं लसीकरण झालेलं आहे. आपण आता तीन लाखाच्या गतीने लसीकरण करायचं असा निर्धार आपण केलेला आहे. त्यामुळे जर आपल्याला अशा स्वरूपात लसीकरण करायचं असेल, तर आपल्याला लसीकरणाची गती जी आपण वाढवलेली आहे, त्यासाठी लागणारी लस देखील तेवढ्याच गतीनं प्राप्त होणं गरजेचं आहे.” असं राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले.

दरम्यान, केंद्र सरकार देशातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. काल केंद्रीय पथकाच्या अहवालानूसार महाराष्ट्र शासनाला पत्र पाठवत सुचना करण्यात आल्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक घेवून कोरोनाला गांभिर्याने घेवून उपाययोजनांची कठोर अमलबजावणी करण्याची व सक्तीने लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version