अन् रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
शहरातील बॕरिकेट्स हटवली

किल्लेधारूर दि.२५(वार्ताहर) शहरात गर्दीला आळा घालण्यासाठी लावण्यात आलेले अडथळे स्थानिक प्रशासनाच्या वतीने हटविण्यात आली असून महिना भरानंतर रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असून गर्दी वाढल्यास मात्र पुन्हा अडथळे बसविण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी नगर परिषद व पोलिस प्रशासनाने मुख्य वर्दळीच्या ठिकाणी बॕरिकेट्स लावण्यात आली होती. आज जिल्हाधिकाऱ्यांचे नवीन आदेश आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने रात्री नऊ वाजता रस्त्यावर लावलेली अडथळे काढण्यास सुरुवात केली. मुख्य रस्त्यावरील हनुमान चौक, बस स्थानक, व मुख्य स्त्याला जोडणारी गल्ली बोळाचे रस्ते गर्दी टाळण्यासाठी बंद केली होती. याबाबत मुख्याधिकारी सुहास हजारे यांनी लोकांच्या वर्दळीसाठी सदरील अढथळे हटविण्यात येत असल्याचे सांगत गर्दी वाढ आटोक्यात येत नसल्यास पुन्हा जैसे थे परिस्थिती करण्यात येणार असल्याचे सांगितले.