Aurangabad Osmanabad औरंगाबाद नामांतराबाबत उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश.

औरंगाबाद दि.24 एप्रिल – औरंगाबाद ( Aurangabad Osmanabad) नामांतराबाबत उच्च न्यायालयाने आज दि.24 रोजी महत्त्वाचे निर्देश दिले असून प्रशासकीय पातळीवर शहराचे नाव अंतिम निर्णय होईपर्यंत औरंगाबादच ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
(Aurangabad Osmanabad Important directions of High Court regarding Aurangabad name change.)
महाराष्ट्रात गेल्याकाही महिन्यात औरंगाबाद व उस्मानाबाद ( Aurangabad Osmanabad) शहर व जिल्ह्याचे नामांतराचा विषय चांगलाच गाजत आहे. ठाकरे सरकार पाठोपाठ शिंदे सरकारने औरंगाबाद व उस्मानाबाद शहर व जिल्ह्याच्या नामांतराचा निर्णय घेतला. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर निर्णयास केंद्र सरकारनेही परवानगी दिली. यानंतर नामांतराचा मार्ग मोकळा झाले असे वाटत असतानाच या निर्णयास आवाहन देणाऱ्या अनेक याचिका मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दाखल झाल्या.
दरम्यान, महसुल विभागाने नामांतरासाठी हरकती व सुचना मागितल्या. यात लाखो अर्ज दाखल झाल्या असून अद्याप यावर निर्णय झालेला नाही. तसेच सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना शहराची नावे बदलण्याचा आग्रह होत असल्याचे निदर्शनास आले. यावर एक जनहित याचिका दाखल झाल्यानंतर उच्च न्यायालयाने याबाबत दि.24 मार्च पर्यंत केंद्र शासनाला उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. परंतू अद्याप अंतिम निर्णय झालेला नसून आज दि.24 एप्रिल रोजी न्यायालयाने (Mumbai High Court) अंतिम निर्णय होईपर्यंत औरंगाबाद व उस्मानाबाद असाच उल्लेख करण्याचे निर्देश दिले आहेत.