धारुर तालुक्यातील जनतेतून निवडून आलेले सरपंच बडतर्फ; अप्पर आयुक्तांचे आदेश.

किल्लेधारूर दि.28 अॉक्टोंबर – भ्रष्टाचार व अकार्यक्षमतेचे आरोप असलेली बहूचर्चीत ग्राम पंचायत गांजपूर च्या सरपंच सुनंदा श्रीराम डापकर यांना अप्पर आयुक्त औरंगाबाद यांनी पदावरून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत. जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला बडतर्फ केल्याची बहुधा पहिलीच घटना घडली आहे.
(Sarpanch post elected from the people of Dharur taluka canceled; Order of the Upper Commissioner.)
या बाबत सविस्तर वृत्त असे की, धारूर (Dharur) तालुक्यातील ग्राम पंचायत, गांजपूर च्या सरपंच सुनंदा श्रीराम डापकर या 2017 साली जनतेतून सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. परंतू ग्राम पंचायत कारभारात सरपंचाची अकार्यक्षमता व अनियमितता दिसत असल्याने सुर्यकांत बाबाराया डापकर, आबासाहेब चंद्रसेन सिरसट, महादेव बाबासाहेब मुंडे, विजयकुमार आनंदराव मुंडे, दिनकर आण्णा डापकर, धनराज साहेबराव घुगे यांनी अप्पर आयुक्त (Upper Commissioner) औरंगाबाद यांचे कडे ग्रा.पं.अधिनियम 39(1) अन्वये तक्रार दाखल केली होती.
या तक्रारी नुसार गटविकास अधिकारी, धारूर यांच्या चौकशी समिती मार्फत चौकशी होऊन मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) बीड यांचे समोर सुनावणी होऊन प्रकरण आयुक्त कार्यालय औरंगाबाद (Aurangabad) येथे अप्पर आयुक्त यांचे न्यायालयात सुनावणी होऊन वादी व प्रतिवादी यांना योग्य संधी देवून सरपंच (Sarpanch) सुनंदा डापकर या ग्रा.पं.अधिनियम 39(1) अन्वये आपले कार्य पार पाडण्यास असमर्थ असल्याचे नमुद करून अंतीम निकाल दि.25 अॉक्टोंबर रोजी देण्यात आला आहे.
या प्रकरणात जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा अहवाल महत्वाचा मानला गेला. या अहवालाच्या निष्कर्षानूसार प्रकरणाचा निकाल देत सरपंच सुनंदा श्रीराम डापकर यांना पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. तक्रारदारांच्या वतीने ॲड. इष्टलिंग मुरगे यांनी बाजू मांडली. प्रा.ईश्वर मुंडे यांनी तक्रारदारांना सहकार्य केले.