चहा स्टॉल, टपरीचालकांवर उपासमारीची वेळ

किल्लेधारूर दि.२०(वार्ताहर) गेल्या दोन महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे चहा स्टॉल व टपरीचालक व्यवसायिक मोठ्या अडचणीत सापडली असुन त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे.

२२ मार्च रोजी सुरु झालेले लॉकडाऊन आज दोन महिने होवूनही कायम आहे. याकाळात सर्वाधिक प्रभावित झालेल्या व्यवसायात चहा स्टॉल, नाश्ता सेंटर किंवा छोटे हॉटेल, पान टपरी चालक यांचा समावेश आहे. या लहान व्यवसायिकांची अक्षरशः उपासमार होत असुन शासनाकडून यांची दखल घेतली जात नाही. सदरील व्यवसाय हे गर्दी होण्यास कारणीभूत असल्याने विशेषतः हे व्यवसाय बंद करण्यात आलेली आहेत. वेळीच या व्यवसायिकांची योग्य नियम व सोशल डिस्टंटींगमध्ये व्यवसाय सुरु न झाल्यास सदरील व्यवसायिकावर मोठे आर्थिक संकट येणार आहे. याबाबत शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!