धारुर घाटात ट्रक पलटी; दैव बलवत्तर म्हणून वाचले तिघांचे जीव

किल्लेधारूर दि.२८(वार्ताहर) आज सकाळी १०.३० वाजता धारुर घाटात ट्रक क्र. एम.एच. ३० एबी २५०० ब्रेक निकामी झाल्याने पलटी झाल्याची घटना घडली असुन यातील तिघांचे दैव बलवत्तर म्हणून कुठलीही इजा झाली नाही.
धारुर घाटात अपघात होण्याची शृंखला सुरुच आहे. राष्ट्रीय महामार्ग असलेल्या ५४८ सी या रस्त्यावर असलेल्या या घाटाचे रुंदीकरण व्हावे ही अनेक दिवसांची मागणी आहे. अरुंद रस्ता असल्याने सतत अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. आज दि.२८ सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास लातूरहुन माजलगावकडे तांदूळ घेवून जाणारा ट्रक क्र. एम.एच. ३० ए.बी. २५०० ब्रेक निकामी झाल्याने पलटी झाला. या ट्रकमध्ये ड्रायव्हरसह दोघे होते. मात्र या अपघातात कसलीही जिवितहानी झाली नाही. वाहनाचे किरकोळ नुकसान झाले असून अपघातस्थळी काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.