जिंनीग वर काम करणारे २७ बिहारी मजूर बिहारकडे रवाना

किल्लेधारूर दि.२३(वार्ताहर); धारूर येथील जिंनीग वर कामासाठी आलेले २७ तरूण बिहारी मजूर प्रशासनाच्या  सतर्कतेमुळे बिहारला रवाना झाली. या मजूराना रवाना करताना त्यांचे चेहऱ्यावर आनंद ओंसडून वाहत होता. गावाची ओढ दिसत होती.

कोरोना मुळे दोन महिन्या पासून सुरू असलेल्या लाॕकडाऊन मुळे सर्व मजूर वर्ग अडचणीत आला आहे. परप्रांतीय मजूरावर अडचणीची वेळ येत असून कामबंद असल्याने उपासमार होत आहे. या मजूराचा गावा कडे जाण्याचा ओढा वाढत असून. प्रशासन या मजूराना त्यांचे गावी पोहचवण्या साठी सर्व उपाययोजना करून एस टी बस, रेल्वेची मोफत सुविधा करण्यात आली आहे. येथील गुरू राघवेंद्र जिंनीग वर बिहार मधील मध्यपूरा जिल्ह्यातिल २७ तरूण मजूर कामास होते. त्यांना लाॕकडाऊन झाल्या पासून हातचे काम बंद झाल्याने आपल्या गावाची ओढ लागली होती. जिंनीग मालक मुरलीशेठ यांनी या मजूराना पाठवण्या साठी प्रशासना कडे पाठापूरावा केला. अखेर प्रशासनाने मराठवाड्यातील बिहार मधील मजूरा साठी औरंगाबाद येथून खास रेल्वे २३ मे रोजी सोडली. धारूर येथून बस ने रेल्वे स्टेशन पर्यंत या मजूराना सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. या मजूराना एस टी चालक सुधाकर फुटाने हे घेऊन जात असताना त्यांचा सत्कार करून मजूराना कोरोना बद्दल दक्षता बाळगण्याचे मार्गदर्शन करून येथून निरोप देण्यात आला. यावेळी प्रतिष्ठीत नागरीक उत्तमलाल तोष्णीवाल, पञकार अनिल महाजन, अतूल शिनगारे, गुप्तहेर विभगाचे पोलीस नाईक वखरे, जिंनीग चे व्यवस्थापक प्रवजंन मुकदम सुंदरराम व इतर उपस्थीत होते. गावाकडे निघाल्यामुळे या मजूराचे चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!