व्हिडीओ न्यूज… रमेश आडसकरांचा आरणवाडी साठवण तलावात जलसमाधीचा इशारा… रास्ता रोकोला उत्स्फूर्त प्रतिसाद.

(व्हिडीओ पाहण्यासाठी खाली जा…)

किल्लेधारूर दि.2 अॉगस्ट – तालुक्यातील आरणवाडी साठवण तलावाचा (Aranwadi storage lake) सांडवा फोडल्या प्रकरणी तसेच राष्ट्रीय महामार्गावर पाचशे मीटरचा रस्ता काम बोगस करणाऱ्या गुत्तेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागण्यांसाठी पाच गावच्या गावकऱ्यांच्या वतीने आज दि.2 आॕगस्ट सोमवार रोजी तलावा जवळ सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपा नेते रमेश आडसकर यांनी सहभाग घेत येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत कारवाई न झाल्यास तलावात उड्या घेवून जलसमाधीचा इशारा दिला आहे.

(Ramesh Adaskar’s warning of Jalasamadhi in Aranwadi storage lake … Spontaneous response to Rasta Rocco.)

धारुर माजलगाव रस्त्या लगत आरणवाडी साठवण तलावाचे काम तब्बल सतरा वर्षा नंतर पुर्ण झाले. या तलावाचे बाजूनेच राष्ट्रीय महामार्ग 548 सी खामगाव सांगोला गेला आहे. महामार्गाचे (National Highway) काम करताना पाटबंधारे विभागाने पर्यायी मार्गा साठी राज्य रस्ते विकास महामंडळास जवळपास तीन कोटी रुपयांचा निधी एमएसआरडीसीकडे वर्ग केला. मात्र या पर्यायी रस्त्यावर पाचशे मिटरचे काम अर्धवट व बोगस करून अटोपण्यात आले.

तलावात पहिल्याच वर्षी भरगच्च पाणी साठा झाला. रस्त्यास भिती निर्माण झाल्यामूळे राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRTC) पाटबंधारे विभागाला (Irrigation department) तसे पत्र दिले. हे पत्र मिळताच पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी तलावाची पाहणी करून पहिल्या वर्षी तलावाला धोका असल्याचा आव आणत चक्क नवा बांधलेला सांडवा फोडला. लाखो लिटर पाणी सोडून दिले.

पाच गावचे ग्रामस्थाचा विरोध असताना पाटबंधारे विभागाने अधिकार शाहीचा वापर करत स्वतःचे गैरकृत्य झाकण्यासाठी चक्क सांडवा फोडला. यामुळे अरणवाडी, चोरांबा, पहाडी पारगाव, थेटेगव्हान , ढगेवाडी येथील ग्रामस्थ या सांडव्या फोडल्या प्रकरणी रस्ते विकास महमंडळ ने रस्त्याचे काम थातूर मातूर व बोगस केल्या प्रकरणी अधिकारी व गुत्तेदार यांची कसून चौकशी करून दोन्ही प्रकारात दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी व हे दोन्ही कामे उच्च दर्जाचे करावेत या मागणी साठी आज 2 आॕगस्ट सोमवारी सकाळी दहा वाजता तलावा जवळ राष्ट्रीय महामार्गा वर रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात भाजपा नेते रमेश आडसकर (Ramesh Adaskar) यांनी येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत शासनाने संबंधितावर कारवाई न केल्यास तलावात उड्या मारुन जलसमाधी घेणार असल्याचे जाहिर केले. यामुळे मात्र प्रशासनाची झोप उडणार असून या विषयाला राजकीय वळण लागणार आहे. या आंदोलनात धारुरसह परिसरातील लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. जवळजवळ दोन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!