डिसाळ नियोजनामुळे पोस्टाचे अनूदान वाटप रखडले

लाभार्थ्यांचा हिरमोड

किल्लेधारूर दि.५(वार्ताहर) गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या विविध योजनांच्या अनूदानाचे वाटप आजही तांत्रिक कारणाने रखडले असून अपेक्षेने आलेल्या लाभार्थ्यांना आजही मोकळ्या हाताने परतावे लागले. पोस्ट कार्यालयात तहसीलदार वंदना शिडोळकर व पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांनी भेट दिली.

येथील डाक कार्यालयाच्या विविध योजनेच्या अनूदानाचे वाटप नसल्याने लाभार्थ्यांतून नापंसती व्यक्त होत असताना पोस्ट कार्यालयास तहसील प्रशासनाने दिलेला संजय गाधी निराधार योजनेचा बाविस लाखाचा धनादेश वटला नसल्याने अनूदान रखडल्याची धक्कादायक माहिती समोर आली होति. उर्वरित योजनेच्या लाभार्थ्यांना मंगळवार दि.५ पासुन अनुदान वाटप करणार असल्याची माहिती पोस्ट मास्टर बी.आय. कोंगलवार यांनी दिली असतानाही आज डिसाळ नियोजनामुळे पुन्हा लाभार्थ्यांना लाभापासुन वंचित रहावे लागल्याचे दिसून आले. आज वाटप असल्याने लाभार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. पोस्ट कार्यालयाकडून करण्यात आलेल्या सोशल डिस्टंटींगच्या नियमांचे गर्दीने भंग झाल्याचे दिसुन आले. सकाळी ७ ते ९.३० पर्यंत एकाही लाभार्थ्याला अनूदान वाटप झाले नाही. यावेळी तहसीलदार वंदना शिडोळकर व पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांनी पोस्टास भेट देत मार्गदर्शक सुचना केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!