शिवनगर तांड्यात पाणी प्रश्नी आमरण उपोषण

प्रश्न मार्गी लागेपर्यंत माघार नाही-आडे

किल्लेधारूर दि.१२(वार्ताहर) तालुक्यातील अंजनडोह येथील शिवनगर तांड्याला सध्या तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसत असून ग्रामस्थांनी याप्रश्नी आमरण उपोषण सुरु केले आहे. याप्रश्नी कायमस्वरुपी तोडगा निघेपर्यंत उपोषणातून माघार घेणार नसल्याची प्रतिक्रिया उपोषणकर्ते युवराज आडे यांनी दिली.

धारुर तालुका तसा प्रतिवर्षी भिषण पाणी टंचाईचा सामना करणारा तालुका आहे. तालुक्यातील अंजनडोह गाव व परिसरही यापैकी एक. अंजनडोह नजीकच्या शिवनगर तांड्यावर जवळजवळ १४० लोकवस्ती आहे. सततच्या पाणी टंचाईला त्रस्त होवून ग्रामस्थांनी पंचायत विभागात तक्रारी केल्या आहेत. याबाबतीत गटविकास अधिकारी सोपान अकेले यांना विचारले असता ग्रामपंचायत कडून अद्याप टंचाई निवारणाचा प्रस्ताव आला नसून प्रस्ताव येताच तातडीने वरीष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. उपोषणकर्ते युवराज आडे व दत्ताभाऊ आडे यांनी तांड्याचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी मिटवावा, तात्काळ पाणी पुरवठा दररोज सुरु करा व मागील वर्षी अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांचे पाणी बिल तात्काळ अदा करा या मागण्या केल्या आहेत. उपोषणकर्त्यांचि भेट विस्तार अधिकारी गिरी व ग्रामविकास अधिकारी साखरे यांनी घेतली आहे. केवळ पंचनामा करत प्रशासनाच्या वतीने आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांनी नाराजी दाखवत सर्व मागण्या मंजूर झाल्याशिवाय उपोषणातून माघार घेणार नसल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!