
किल्लेधारूर दि.२९(वार्ताहर) इस्लामपूर येथून किल्लेधारूर तालुक्यातील आलेल्या ६ मजूरांसह ३२ जनांना आज दि.१९ एप्रिल रोजी २२ दिवसांच्या क्वारांटाईन नंतर सुट्टी करण्यात आली असुन कस्तुरबा बालिका विद्यालयात ठेवण्यात आलेल्या ११८ मजूरांची आरोग्य तपासणी सुरु करण्यात आली असुन त्यांचेही आदेश प्राप्त होताच लवकरच सुट्टी करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार व्हि.एस. शिडोळकर यांनी दिली.
इस्लामपूर मधून तालुक्यात दि.२९ शनिवारी रोजी ऊसतोड मजूर आपल्या गावी परतण्यासाठी तालुक्यात दाखल झाले होते. यातील सहा उसतोड मजूर व त्यांच्या संपर्कात आलेल्या २६ अशा ३२ जनांना आरोग्य विभागाने मध्यरात्री बारा वाजता किल्लेधारूर येथील विलगीकरण कक्षात १४ दिवसांसाठी ठेवले होते. प्रशासनाने संबंधित ३२ जनांना खबरदारीचा उपाय म्हणून आणखी १४ दिवस विलगीकरण कक्षातच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दोन दिवसांपुर्वी राज्य शासनाने ऊसतोड मजुरांना घरापर्यंत सोडण्याचा निर्णय घेतला होता. या अनुशंगाने आज येथील ३२ जनांना २२ दिवसानंतर रुग्णवाहिकेतून घरापर्यंत सोडण्यात आले.
तर येथील पोलिस प्रशासनाने जिल्हा बंदीच्या प्रकरणात उसतोड मजूरांना घेवून जाणाऱ्या वाहनावर खटले दाखल करत ११८ जनांना येथील कस्तुआहेस गांधी बालिका विद्यालयात अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. या ११८ जनांचीही आरोग्य तपासणी करण्यात येत असुन वरिष्ठांचे आदेश प्राप्त होताच त्यांचीही सुट्टी करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार व्हि.एस. शिडोळकर यांनी दिली. यावेळी मुख्याध्याधिकारी सुहास हजारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. चेतन आदमाने यांची उपस्थिती होती.