कोरोना नंतर शेतकऱ्यांवर टोळधाड संकट

दक्षता बाळगण्याचे कृषी विभागाचे आवाहन

किल्लेधारूर दि.२७ (वार्ताहर ) कोरोना संकटातून अद्याप बाहेर आले नसताना शेतकऱ्यांवर टोळधाड सञ येण्याची भिती निर्माण झाली आहे. देशाच्या काही भागात हे आले असून विदर्भा कडून राज्यात शिरकाव करत आहे. शेतकऱ्यांच्या सर्व पिकाचे दृष्टीने हे घातक असून शेतकऱ्यांनी वेळीच दक्षता घेण्याच आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेतकरी कोरोना चे संकटाने अगोदरच बेजार आहे. गत हंगामातील कापूस, तुर, हरभरा अद्याप बराच विक्रीचा बाकी असताना नविन हंगामाचे तोंडावरच शेतकऱ्यांसमोर दुसरे टोळधाडचे संकट उभे राहत आहे. टोळधाड पिकावर येत असून मध्यप्रदेश मधून विदर्भ मार्गे महाराष्ट्रात शिरकाव करत आहे. शेतकऱ्यांनी या पासून सावध राहण्यासाठी कृषी विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जवळपास १६ ते १९ कि.मी.तासी वेगाने वाऱ्याच्या सोबत हे उडतात. एक झुंड/टोळी दिवसाला ५ ते १३० किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त चा प्रवास सहज एका दिवसात करतात. ५ हजार किलोमीटर चा प्रवास १० दिवसात पार केल्याची नोंद यांच्या नावावर आहे. एक टोळधाड २ ग्रॅम प्रत्येक दिवशी अन्न खातो आणि एका टोळी/झुंड मध्ये किमान ४० दशलक्ष जरी पकडले तरी ३५ हजार लोकांना लागणारे अन्न हे एका दिवसात खातात. युएसडिए नुसार एका माणसाला दिवसाला २.५ kg या हिशोबाने अन्न लागते. यांच्या एका टोळीची संख्या ४० ते ८० दशलक्ष एवढी असते. हे जवळजवळ सर्व पिकाचे पान, शेंडे, फुलं, फळं, बिया, फांदी आणि खोड असं सर्वच खातात. गहू, बाजरी, मक्का, ज्वारी, भात, ऊस, कापूस, सर्व फळबाग, भाजीपाला, कडधान्ये आणि गवत सुद्धा खातात. आतापर्यंत वेगवेगळ्या देशात १९१५ पासून याचा कहर बघायला मिळत आहे.

आता हे संकट आपल्या दिशेने वाटचाल करत आहे. मादी एका वेळेला ८०-१५८ अंडी देते आणि अश्याप्रकारे एक मादी तिच्या जीवनक्रम मध्ये किमान तीन वेळेस अंडी देत असल्याने यांची संख्या झपाट्याने वाढत राहते. अटॅक दिसायला लागला की सुरुवातीलाच जर युध्द पातळीवर उपाययोजना केल्या नाही तर हे संकट रोखणे जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे आता पासूनच शेतकऱ्यांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!