खुषखबर … अडीच महिन्यानंतर एसटी बस रस्त्यावर; हळूहळू होणार बससेवा पुर्ववत.

औरंगाबाद दि.4 जून – अडीच महिन्यांच्या खंडानंतर एसटी महामंडळाच्या बस (ST Bus) सेवेला 1 जून पासून सुरुवात झाली असून गुरुवारी औरंगाबाद (Aurangabad) विभागातून पुणे, धुळे, नाशिक, जळगाव, जालना आदी मार्गावर सुमारे 26 बसेस धावण्याची माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांकडून मिळाली.
(Good news … ST bus on the road after two and a half months; The bus service will be resumed gradually.)
एसटी महामंडळाची बस (ST Bus) सेवा अत्यावश्यक सेवेत असली तरी कोरोनाच्या दहशतीमुळे घराबाहेर पडणे व प्रवास करणे टाळले होते. यामुळे एसटीला ही प्रवासी सेवा बंद करावी लागली.
तब्बल अडीच महिन्याच्या विश्रांतीनंतर एक जून पासून लॉकडाऊनमध्ये (lockdown) काही प्रमाणात सूट दिल्याने अनेक प्रवासी कामानिमित्त विविध ठिकाणी जाण्यासाठी एसटी कडे वळले आहेत. त्यामुळे 1 जून पासून एसटीने धुळे, पुणे, जळगाव, नाशिक, जालना आदी मार्गावर प्रवासी सेवा सुरू केली आहे.
पहिल्या दिवशी केवळ 14 ते 15 बसेस विविध मार्गावर धावल्या. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी थोडा प्रतिसाद वाढल्याने 26 गाड्या विविध मार्गावर सोडण्यात आल्या. हळूहळू प्रवासी संख्येत वाढ होण्याची शक्यता असून प्रवासी संख्या वाढताच विविध मार्गावर आणखी बस सेवा देण्यात येईल अशीही माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून लॉकडाऊनमुळे (lockdown) एसटी सेवा विस्कळीत झाली होती. आता पुन्हा एसटी या महामार्गावर पुन्हा धावणार आहे. त्याबाबत नाशिक 1 (Nasik) आगाराकडून नविन बस स्थानकातून सुटणाऱ्या बसेसची माहिती आगार प्रमुख 1 यांनी दिली आहे.
ही बस सेवा चालू ठेवण्यात आलेली असली तरी त्यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व प्रवाशी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा असे आगार प्रमुखांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना या बससेवेचा लाभ होईल का नाही हे अद्याप स्पष्ट नाही.
नाशिकहून (Nasik) पुणे, औरंगाबाद (Aurangabad), चोपडा, जळगाव, पाचोरा, शिरपुर, मुंबई, बोरीवली, नंदुरबार या एसटी बस फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. यामुळे हळूहळू संपुर्ण महाराष्ट्रात अडीच महिन्याच्या खंडानंतर टप्प्याने बससेवा पुर्ववत होणार आहे.