धारुरात शेतकरी आत्महत्या

किल्लेधारूर दि.५(वार्ताहर) तालूक्यातील जायभायवाडी येथील शेतकरी रामचंद्र गणपती जायभाये वय (५८) वर्ष यांनी शेतीतील अल्प उत्पादन व बँकेचे कर्ज यांला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील जायभायवाडी येथील शेतकरी रामचंद्र गणपती जायभाये वय (५८) वर्ष यांनी शेतीतील अल्प उत्पादन व बँकाचे पिक कर्ज वेळेवर करता येत नसल्याने कर्जास कंटाळून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे अंबाजोगाई येथे स्वा. रा. ति. रुग्नालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परीवार आहे. धारूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. हे. काॕ. राठोड हे करत आहेत.