प्रेम त्रिकोणातून एक खुन तर दोन आत्महत्या

लातूर दि.११(प्रतिनिधी) जिल्ह्यातील रेणापुर तालुक्यात प्रेम त्रिकोणातून एक खुन तर दोन आत्महत्या झाल्याचे निष्पन्न झाले असुन याप्रकरणी रेणापुर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद झाला आहे.

रेणापुर तालुक्यातील खरोळा येथे सदरील घटना घडली. सुखी संसार सुरु असताना अनैतिक संबंधातील अडथळ्यातून सदरील प्रकार घडल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. बारा दिवसांपुर्वी गावात दोन आत्महत्या झाल्या तर एका कोरड्या विहीरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. दि.२७ मे रोजी मनिषा लखन राऊतराव हिने आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसात मयत मनिषाचे वडीलांनी फिर्याद देवून पती, सासु सासरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. या गुन्हाच्या पोलिस तपासात सदरील प्रकार हा प्रेम त्रिकोणाचा असल्याला छडा लागला. याच प्रकरणात पोलिसांनी गावातील विजयकुमार छपरे यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र लघूशंकेचा बहाणा करुन छपरे याने घरी जावून आत्महत्या केली. याच दरम्यान मनिषाचा पती लखन याचा मृतदेह कोरड्या विहिरीत आढळून आला. या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल चौकशी अंति मनिषा व विजयकुमार याने अनैतिक संबंधात अढथळा येत असल्याने लखन याचा काटा काढत खून केला. तर पत्नी मनिषा हिने बेचैनी मुळे गळफास घेवून आत्महत्या केली. तर पोलिसांना संशय आल्याने सर्व प्रकार अंगलट येणार असल्याने विजयकुमारने घरात आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास रेणापुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक गोरख दिवे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!