पावसाचा हाहाकार… बीडला रात्री 10.30 वाजता जलसंपदा विभागाची बैठक; खा. रजनीताई करणार दौरा.

बीड दि.29 सप्टेंबर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (Nationalist Congress Party) प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त बीड (Beed) जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दरम्यान चक्क रात्री 10.30 वाजता मंत्री जयंत पाटील व पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी जलसंपदा विभागाची बैठक घेतली. तर नवनिर्वाचित खासदार रजनीताई पाटील (Rajani Patil) याही अतिवृष्टीग्रस्त बीड जिल्ह्यात आज दौरा करणार आहेत.
(Rainstorm … Meeting of Water Resources Department at 10.30 pm in Beed; MP Rajinitai will tour.)
बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उभय मंत्री महोदयांनी चक्क रात्री 10.30 वा. जलसंपदा विभागाची (Department of Water Resources) बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यातील जलप्रकल्प, त्यांची सुरू किंवा प्रस्तावित असलेली दुरुस्ती व अन्य कामे यांसह नवीन प्रस्तावित केलेली कामे तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या मागण्या आदी बाबींवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जयंत पाटील यांचे आभार मानले.
अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी व आढावा
बीड, जालना, परभणी, औरंगाबाद आणि मराठवाड्यातील इतर भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक गावांमध्ये पाणी शिरलं. मंत्री जयंत पाटील यांनी बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त (heavy rains) भागांचा दौरा केला व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तर धनंजय मुंडे यांनी पूरग्रस्त भागात (Flooded area) सुरू मदत कार्याचा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आढावा घेतला व पूर पीडितांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
कार्यकर्त्यांशी संवाद आणि विभागाचा आढावा
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून जयंत पाटील राज्यभर पक्षाचा आढावा घेत आहे. याच यात्रेच्या निमित्ताने ते आज बीड जिल्ह्यात होते. पूरपरिस्थितीची पाहणी करत असताना त्यांनी बीड जिल्ह्याच्या कार्यकारिणीचा तसेच केज , बीड या मतदारसंघांचाही धनंजय मुंडे यांच्या समवेत आढावाही घेतला. परभणी जिल्हयातील गंगाखेड चाही त्यांनी आढावा घेतला.
कार्यकर्त्यांच्या घरी भेटीगाठी देत त्यांनाही दिले बळ
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष (State President) जयंत पाटील हे गेले तीन वर्षांपासून पक्षाशी प्रत्येक माणूस जोडत आहे. त्याअनुषंगाने आज बीड व परभणी जिल्ह्यात असताना त्यांनी आ. संदीप क्षीरसागर, डॉ. मधूसूदन केंद्रे, डॉ. नरेंद्र काळे, ऍड तोतला, उषाताई दराडे, डॉ. पंडित, ठोसर आदि प्रमुख कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी गाठीभेटी घेत त्यांना बळ दिले. हे सत्र अगदी बुधवारी पहाटे उशिरापर्यंत सुरू होते.
खासदार रजनीताई पाटील देणार पूरग्रस्त गावांना आज भेटी…
राज्यसभेच्या नवनियुक्त खा. रजनीताई पाटील यांनी खासदार (MP) पदाचा पदभार स्वीकारताच कामाला लागल्या असून बुधवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी केज व अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या गावातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यांच्या नुकसान पाहणी दौऱ्याची सुरवात दुपारी दोन वाजता केज (Kaij) तालुक्यातील नायगाव येथून होणार आहे. बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी ताईंनी तातडीच्या दौऱ्याचे आयोजन केले असून त्या आज (दि. 29) रोजी शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.
असा आहे दौरा.
दुपारी 2 वाजता नायगांव, दुपारी 2.30 वाजता सौंदणा, दुपारी 3 वाजता आपेगांव ता. अंबाजोगाई, दुपारी 3.30 वाजता कोपरा ता. अंबाजोगाई, दुपारी 4. वाजता अंजनपूर ता. अंबाजोगाई, दुपारी 4.30 वाजता
देवळा ता. अंबाजोगाई, सायं. 5 वाजता माकेगांव ता. अंबाजोगाई, सायं. 5.30 वाजता, सावळेश्वर पैठण ता. केज, सायं. 6. वाजता केज – बोबडेवाडी रस्ता इत्यादी ठिकाणची पाहणी करणार असून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.