India Pakistan War भारताचा पाकमधील दहशतवादी तळांवर हल्ला… अॉपरेशन सिंदूर.

दिल्ली दि.7 मे – India Pakistan War भारतीय लष्कराने रात्री 3 वाजल्याच्या सुमारास पाकमधील बहावलपूर येथील अतिरेकी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात जैश ए मंहमदचे 100 हून अधिक अतिरेकी मारले गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष करुन मसुद अजहर व हाफिज सईदच्या 9 ठिकाणं उध्दव्सत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. भारताकडून पाकिस्तान सिमेलगतची सर्व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण रद्द केली आहेत.
भारतीय लष्कराने अॉपरेशन सिंदूर राबवून पाकमधील नऊ अतिरेकी स्थळ उदव्स्त करण्यात आली. सकाळी दहा वाजता या हल्ल्याबाबत भारतीय सैन्य पत्रकार परिषद घेणार आहे. तर पाक व्याप्त कश्मिरमध्येही घोसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पाकिस्तानमध्ये भारतीय हल्ल्यामुळे लाहोर, सियालकोट विमानतळ बंद करण्यात आली आहेत. या हल्ल्यात जैशा ए मंहमदचे तळ उध्वस्त झाले आहे. याच दरम्यान पाकिस्तानमधील पंजाबमध्ये आणीबाणी जाहिर करण्यात आली आहे. भारताने हल्ल्याबाबत सर्व मित्र राष्ट्रांना माहिती दिली आहे.