चार दिवसानंतर बससेवा सुरु; दिडहजार कर्मचारी कामावर परतले, 36 बसेस धावल्या…

मुंबई दि.13 नोव्हेंबर – राज्यभरात गेल्या पाच दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून महामंडळाकडून निलंबनाची कारवाई करण्यात येत आहेत. यातच एसटी महामंडळाचे (ST Corporation) उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी पत्रकारांशी संवाद साधत शुक्रवारी काही आगारातून 36 बसेस धावल्या असून 800 ते 900 प्रवाशांची सोय झाल्याचे सांगितले. लवकरच एसटी सेवा पुर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगून आतापर्यंत 1 हजार 532 कर्मचारी कामावर परतले असल्याची माहिती दिली.

(Bus service resumes after four days; One and a half thousand employees returned to work, 36 buses ran …)

संप मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री (Chief Minister) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व परिवहन मंत्री (Transport Minister) तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष (President of ST Corporation) ॲड. अनिल परब (Anil Parab) यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत 1 हजार 532 कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यामुळे एसटीची वाहतूक आता पूर्वपदावर येत असून आज विविध आगारातून 36 गाड्या धावल्या, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. दरम्यान, संपामुळे एसटी महामंडळाचे सुमारे 125 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमिवर एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी थेट उत्तरे दिली. संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक सुरू करण्याची आमची इच्छा आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कामावर यायचे आहे, त्याची कुठेही अडवणूक होता कामा नये यासाठी स्थानिक पोलीस (Police) प्रशासनाची मदत घेतली जात आहे. त्याला आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. कामगारांच्या उपस्थितीमुळे शुक्रवारी 17 आगारातून 36 बसेस रवाना केल्या. सुमारे 800 ते 900 प्रवाशांनी प्रवासदेखील केला आहे. याशिवाय खासगी वाहनेदेखील आगारातून (Depot) सोडल्या जात आहेत, असेही श्री.चन्ने यांनी सांगितले.

एसटीचे कर्मचारी (ST employees) कामावर परतावे यासाठी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब तसेच एसटी महामंडळ प्रशासनानेही आवाहन केले आहे. त्यानुसार अनेकांना कामावर परतायचे आहे. जे कामावर येतील त्यांना संरक्षण दिले जाईल, असे सांगतानाच अनेक कर्मचारी डेपो सुरू करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे लवकरच एसटीची वाहतूक सुरु होईल. त्यामुळे हा संप सुरू न ठेवता सर्व कामगारांनी तात्काळ कामावर रूजू व्हावे, असे आवाहनही श्री. शेखर चन्ने यांनी केले.

बसवर दगडफेक…
संपाची कोंडी फोडण्यासाठी इस्लामपूर आगारातून इस्लामपूर-वाटेगाव एस.टी. सोडण्यात आली. गाडी प्रवाशांना घेवून इस्लामपुरातून रवाना झाली. वाटेगाव येथे प्रवाशांना उतरुन पुन्हा इस्लामपूरकडे येण्यासाठी वाटेगाव स्थानकासमोर थांबली होती. यावेळी अज्ञातांनी गाडीवर दगडफेक करीत गाडीच्या काचा फोड्या. यामध्ये 10 ते 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कासेगाव पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महामंडळाकडून मोठे पाऊल उचलण्याची तयारी.
राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी सुरु केलेला संप राज्य सरकारकडून आवाहन करुनही मागे घेण्यात येत नसल्याने राज्य सरकारने मोठे पाऊल उचण्याची तयारी सुरु केली असल्याची माहिती समोर आली आहे. एसटी सेवा पूर्ण पदावर आणण्यासाठी सरकारकडून 2500 नव्या उमेदवारांना तातडीने कामावर रुजू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हे नवे उमेदवार रुजू होईल, असे संकेत मिळत आहेत.

त्यामुळे हा संप मोडीत काढण्यात येणार असल्याचे दिसत आहे. ज्या दोन ते अडीच हजार उमेदवारांची एसटी महामंडळाने आधी परीक्षा घेतली आहे. तसेच वाहन चाचण्या घेतल्या आहेत, त्या उमेदवारांना संपाच्या पार्श्वभूमीवर एसटी. महामंडळाकडून तातडीने रुजू केले जाणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!