भीषण अपघातात पती पत्नी ठार…. माजलगाव महामार्गावर अपघात

बीडः दि.७(प्रतिनिधी) परभणीहून औरंगाबादला नातेवाईकाच्या लग्नास जाणाऱ्या पती पत्नी दोघांचा अपघातात (Accident) मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यातील भेंड खूर्द जवळ घडली.

परभणी जिल्ह्यातील बनवस येथील कुटूंब नातलगाच्या लग्नासाठी कार क्र. एम.एच. २४ व्ही. ९२५७ या वाहनाने जात असताना रात्री दिडच्या सुमारास हा अपघात (Accident) झाला. माजलगाव पाथर्डी राष्ट्रीय महामार्गावर भेंड खूर्द नजीक कार चालकाचा ताबा सुटल्याने ऊस घेवून जाणाऱ्या ट्रॕक्टरला जोराची धडक दिली. ट्रॕक्टरच्या ऊसाने भरलेल्या ट्रेलरमध्ये कार घुसून यात पती पत्नी जागीच ठार झाले तर इतर तीन गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाली. मयतांची व्यंक विश्वनाथ बल्लाळे (६०) व सुलोचना विश्वनाथ बल्लाळे (५०) अशी नावे आहेत. अन्य तीन जन या अपघातात जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी (Police) दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!