लग्नकार्याला परवानगी मात्र जिल्हाबंदीचा ब्रेक

किल्लेधारूर दि.२(वार्ताहर) लॉकडाऊन मुळे अडचणीत सापडलेल्या लग्नकार्यास सुरुवात झाली असली तरी परजिल्ह्यातून येणाऱ्या वराडी मंडळाला मात्र जिल्हाबंदीचा फटका बसत असल्याचे दिसुन येत आहे.

मार्च व एप्रिल ची लगीनघाई यंदा कोरोनाने मोडित काढली. गेल्या दोन महिन्यांपासुन असलेल्या लॉकडाऊन मुळे अनेक मुहूर्त पुढे ढकलण्यात आली. तर काहींनी अगदी तुरळक लोकांत प्रशासनाच्या निर्देशाचे पालन करत लग्न कार्य उरकून घेतली. नवीन आदेशानुसार लग्न कार्याची बंदी शिथिल करण्यात आली मात्र ५० व्यक्ती पेक्षा जास्त लोक लग्न कार्यात एकत्र येण्यास बंदी राहणार आहे. कसल्याही परवानगी शिवाय लग्न कार्य करता येणार असले तरी तहसील प्रशासनाकडे याबाबत पुर्व सुचना द्यावी लागणार आहे. परंतू परजिल्ह्यातून येणाऱ्या वराडी मंडळाला मात्र वाहनाच्या नियमामुळे प्रवास करणे न परवडणारे झाले आहे. जिल्हाबंदी कायम असल्याने दुचाकी वर एक, तीन व चारचाकी वाहनात वाहक व दोन सहप्रवासी असा नियम लावण्यात आला आहे. यामुळे परजिल्ह्यातून येणाऱ्या वराडी मंडळीस ब्रेक बसला आहे. सदरील शिथिलता ही कंन्टेंन्मेट झोन वगळून असल्याची माहिती नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!