वाहनधारकांनी वाहतूकीचे नियम पाळावित- स.पो.नि. धस

किल्लेधारूर दि.२६(वार्ताहर) जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नवीन नियमानुसार वाहनधारकांनी वाहतूकीचे नियम पाळावित नसता पोलिस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती धारुर पोलिस ठाण्याच्या प्रभारी सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांनी दिली.
काल दि.२५ रोजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नवीन आदेश निर्गमित करत मोठ्या प्रमाणात शिथिलता दिली. यात वाहतूकीच्या नियमांचाही समावेश होता. नवीन नियमानूसार दुचाकी साठी केवळ एक व्यक्ती, तीन चाकी वाहनासाठी दोन प्रवासी एक चालक, चार चाकी वाहनात एक चालक व दोन सहप्रवासी विनाअट प्रवास करु शकतात. शहरात दुचाकी चालकांची विनाकारण वर्दळ, विना सायलंसर दुचाकी चालवून ध्वनीप्रदुषण करणे तसेच शहरात पार्किंगचे नियम तोडणे अशा प्रकाराना आळा घालण्याची सुचना दिल्या. वाहतूकीच्या नियमाचे पालन करुन जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन करत कठोर कारवाईचा इशारा सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांनी दिला आहे.